म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
शेतकरी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय नाशिकच्या शेतकऱ्यांनी घेतल्याने नागरिकांना भाजीपाला मिळणे आणखी दुरापस्त झाले आहे. नाशिकरोडसह शहरात भाजीपाल्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
नाशिक बाजार समितीबरोबरच नाशिकरोड येथील उपबाजार समितीही बंदच ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या दोन्ही समित्यांमध्ये शेतमाल व भाज्या न आणल्याने शहरात पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे ज्या किरकोळ विक्रेत्यांकडे भाज्या मिळत आहेत तेथे नागरिकांची गर्दी होत आहे. नाशिकरोडला उड्डाणपुलाखाली तसेच जेलरोड, दसक, जेलरोड-सायखेडारोड आणि उपनगर येथे भाजीबाजार भरतो. या बाजारात भाज्यांची आवक दोन दिवसांपासून मंदावली आहे. विक्रेत्यांकडे जो साठा होता त्यावरच गरज भागवली जात आहे. कांदे व बटाटे बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. पुरवठा कमी असल्याने भाज्यांचे दर वाढले होते. मिरची आणि भेंडी वीस रुपये पावशेर होती. वांगे मुबलक असल्याने दहा रुपये पावशेर होते. फ्लावर व कोबीचा गड्डा पंधरा ते वीस रुपये प्रतिनग होता. दहाची ढोबळी मिरची पंधरा रुपये पावशेर होती. चाळीस ते पन्नास रुपयाचे आंबे आणून त्यावर दोनवेळची गुजराण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
विक्रेते वैतागले
भाजीविक्रेत्यांची गुजराण शेतीमालावर असते. शेतकऱ्यांनी माल आणला तर ते भाजी विक्री करू शकतात. संपामुळे माल येत नसल्याने या विक्रेत्यांचे हाल होत आहेत. शाळा सुरू होण्याचे दिवस असल्याने मुलांचा खर्च तोंड आवासून उभा आहे. तसेच रोजचा घरचा खर्च कसा करायचा असाही प्रश्न आहे. त्यामुळे संप त्वरित मागे घेण्याची मागणी विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांनी केली आहे.
शेतकरी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय नाशिकच्या शेतकऱ्यांनी घेतल्याने नागरिकांना भाजीपाला मिळणे आणखी दुरापस्त झाले आहे. नाशिकरोडसह शहरात भाजीपाल्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
नाशिक बाजार समितीबरोबरच नाशिकरोड येथील उपबाजार समितीही बंदच ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या दोन्ही समित्यांमध्ये शेतमाल व भाज्या न आणल्याने शहरात पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे ज्या किरकोळ विक्रेत्यांकडे भाज्या मिळत आहेत तेथे नागरिकांची गर्दी होत आहे. नाशिकरोडला उड्डाणपुलाखाली तसेच जेलरोड, दसक, जेलरोड-सायखेडारोड आणि उपनगर येथे भाजीबाजार भरतो. या बाजारात भाज्यांची आवक दोन दिवसांपासून मंदावली आहे. विक्रेत्यांकडे जो साठा होता त्यावरच गरज भागवली जात आहे. कांदे व बटाटे बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. पुरवठा कमी असल्याने भाज्यांचे दर वाढले होते. मिरची आणि भेंडी वीस रुपये पावशेर होती. वांगे मुबलक असल्याने दहा रुपये पावशेर होते. फ्लावर व कोबीचा गड्डा पंधरा ते वीस रुपये प्रतिनग होता. दहाची ढोबळी मिरची पंधरा रुपये पावशेर होती. चाळीस ते पन्नास रुपयाचे आंबे आणून त्यावर दोनवेळची गुजराण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
विक्रेते वैतागले
भाजीविक्रेत्यांची गुजराण शेतीमालावर असते. शेतकऱ्यांनी माल आणला तर ते भाजी विक्री करू शकतात. संपामुळे माल येत नसल्याने या विक्रेत्यांचे हाल होत आहेत. शाळा सुरू होण्याचे दिवस असल्याने मुलांचा खर्च तोंड आवासून उभा आहे. तसेच रोजचा घरचा खर्च कसा करायचा असाही प्रश्न आहे. त्यामुळे संप त्वरित मागे घेण्याची मागणी विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांनी केली आहे.