नाशिक:
नाशिककरांना येत्या काही दिवसांत पाणीकपातीला सामोरं जावं लागण्याची चिन्हं आहेत. आटलेला जलसाठा आणि लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाण्याच्या पातळीची पाहणी केल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसे संकेत दिले आहेत.
गंगापूर धरणातील पाण्याच्या पातळीनं तळ गाठला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पाणीकपातीबाबत चर्चा सुरू झाली आहे. शहरातील काही भागात दिवसातून दोनदा पाणीपुरवठा केला जातो. त्या भागात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. परंतु त्याआधी अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अहवालानंतर पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
नाशिककरांना येत्या काही दिवसांत पाणीकपातीला सामोरं जावं लागण्याची चिन्हं आहेत. आटलेला जलसाठा आणि लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाण्याच्या पातळीची पाहणी केल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसे संकेत दिले आहेत.
गंगापूर धरणातील पाण्याच्या पातळीनं तळ गाठला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पाणीकपातीबाबत चर्चा सुरू झाली आहे. शहरातील काही भागात दिवसातून दोनदा पाणीपुरवठा केला जातो. त्या भागात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. परंतु त्याआधी अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अहवालानंतर पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.