म. टा. वृत्तसेवा, येवला
वनविभागाने वनक्षेत्रात जागोजागी केलेल्या ‘वॉटरहोल’ अन् सिमेंट बंधाऱ्यांमुळे यंदाच्या उन्हाळ्यात येवला तालुक्यातील हरीण व काळविट या वन्यजिवांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे. त्यातून पूर्वीच्या तुलनेत यंदा हरणांच्या मृत्यूचे प्रमाण जवळपास ८० टक्क्यांनी घटले आहे.
येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागामध्ये राजापूर, ममदापूर, रेंडाळे या परिसरात सुमारे ८ हजार हेक्टरच्या वर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रामध्ये हजारोंच्या संख्येने हरीण, काळविट हे वन्यजीव कळपाने राहतात. या वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वॉटरहोलद्वारे सुटला असून, वनविभागाकडून या वॉटरहोलमध्ये दहाबारा दिवसाआड पाण्याचे टँकरद्वारे पाणी टाकले जाते. यामुळे हरणांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
राजापूर ममदापूर परिसरातील वनक्षेत्रामध्ये तीन हजारांहून अधिक हरीण व काळविटांची संख्या आहे. वनविभागाकडून २० सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. २० वॉटरहोलही तयार करण्यात आले आहेत. या सिमेंटच्या बंधाऱ्यामध्ये आजही काही प्रमाणात पाणी शिल्लक आहे. या पाण्यामुळे हरीण आपला कळप व वस्ती सोडून जात नाहीत. साधारणपणे एका वॉटरहोलमध्ये ९ हजार लिटरच्या आसपास पाणी मावते. हरणांसह वन्यप्राण्यांना हे पाणी आठ ते दहा दिवस पुरते. काही ठिकाणी बोअरवेलद्वारे वॉटरहोलमध्ये पाणी पुरवले जाते. त्यासाठी सोलर पंपाचाही उपयोग केला जातो.
वनविभागाने वनक्षेत्रात जागोजागी केलेल्या ‘वॉटरहोल’ अन् सिमेंट बंधाऱ्यांमुळे यंदाच्या उन्हाळ्यात येवला तालुक्यातील हरीण व काळविट या वन्यजिवांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे. त्यातून पूर्वीच्या तुलनेत यंदा हरणांच्या मृत्यूचे प्रमाण जवळपास ८० टक्क्यांनी घटले आहे.
येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागामध्ये राजापूर, ममदापूर, रेंडाळे या परिसरात सुमारे ८ हजार हेक्टरच्या वर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रामध्ये हजारोंच्या संख्येने हरीण, काळविट हे वन्यजीव कळपाने राहतात. या वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वॉटरहोलद्वारे सुटला असून, वनविभागाकडून या वॉटरहोलमध्ये दहाबारा दिवसाआड पाण्याचे टँकरद्वारे पाणी टाकले जाते. यामुळे हरणांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
राजापूर ममदापूर परिसरातील वनक्षेत्रामध्ये तीन हजारांहून अधिक हरीण व काळविटांची संख्या आहे. वनविभागाकडून २० सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. २० वॉटरहोलही तयार करण्यात आले आहेत. या सिमेंटच्या बंधाऱ्यामध्ये आजही काही प्रमाणात पाणी शिल्लक आहे. या पाण्यामुळे हरीण आपला कळप व वस्ती सोडून जात नाहीत. साधारणपणे एका वॉटरहोलमध्ये ९ हजार लिटरच्या आसपास पाणी मावते. हरणांसह वन्यप्राण्यांना हे पाणी आठ ते दहा दिवस पुरते. काही ठिकाणी बोअरवेलद्वारे वॉटरहोलमध्ये पाणी पुरवले जाते. त्यासाठी सोलर पंपाचाही उपयोग केला जातो.