म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत नाशिक जिल्ह्यातील सटाणा, देवळा, कळवण, चांदवड, मालेगाव या तालुक्यातील पाणीपातळी सर्वाधिक घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्चमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १५ पैकी सटाणा तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक कमी असून ती ९.९३ मीटरने कमी झाली आहे.
गेल्या पाच वर्षात या तालुक्याची सरासरी पातळी १०.८८ ने कमी झाली होती. त्यामुळे यावर्षी ही घट कमी असली तरी ती चिंतेचीच आहे. सटाणापाठोपाठ देवळा ८.७० मीटर, कळवण ७.८२ मीटर घट आहे. सर्वाधिक कमी घट धरणांचे तालुके म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहे. इगतपुरीची घट ३.०८ मीटर तर त्र्यंबकेश्वर येथील घट ३.३६ मीटर आहे. गेल्या पाच वर्षात ती जास्त होती पण यावेळेत ती १ मीटरने कमी आहे.
भूजल सर्वेक्षण विभागातर्फे मार्च महिन्यात जिल्ह्यातील १८५ सार्वजनिक विहिरींतील पाण्याची पातळी पाहिली असता त्यात घट झाल्याचे निष्पन्न झाले. एकीकडे ही घट झाली असली तरी पाच वर्षातील मार्च महिन्यातील सरासरी पातळी व या वर्षातील मार्चमधील पातळी यामधील फरक काढली. यानंतर या मार्चमधील पातळी चांगली असल्याचे बोलले जात आहे. भूजल पातळी मोजण्यासाठी जिल्ह्यातील विहिरींची निश्चिती करण्यात आली आहे. या विहिरीतून वर्षातून चार वेळा भूजल पातळी मोजली जाते. त्या आधारावरच सरासरी भूजल पातळी काढली जाते.
भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत नाशिक जिल्ह्यातील सटाणा, देवळा, कळवण, चांदवड, मालेगाव या तालुक्यातील पाणीपातळी सर्वाधिक घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्चमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १५ पैकी सटाणा तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक कमी असून ती ९.९३ मीटरने कमी झाली आहे.
गेल्या पाच वर्षात या तालुक्याची सरासरी पातळी १०.८८ ने कमी झाली होती. त्यामुळे यावर्षी ही घट कमी असली तरी ती चिंतेचीच आहे. सटाणापाठोपाठ देवळा ८.७० मीटर, कळवण ७.८२ मीटर घट आहे. सर्वाधिक कमी घट धरणांचे तालुके म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहे. इगतपुरीची घट ३.०८ मीटर तर त्र्यंबकेश्वर येथील घट ३.३६ मीटर आहे. गेल्या पाच वर्षात ती जास्त होती पण यावेळेत ती १ मीटरने कमी आहे.
भूजल सर्वेक्षण विभागातर्फे मार्च महिन्यात जिल्ह्यातील १८५ सार्वजनिक विहिरींतील पाण्याची पातळी पाहिली असता त्यात घट झाल्याचे निष्पन्न झाले. एकीकडे ही घट झाली असली तरी पाच वर्षातील मार्च महिन्यातील सरासरी पातळी व या वर्षातील मार्चमधील पातळी यामधील फरक काढली. यानंतर या मार्चमधील पातळी चांगली असल्याचे बोलले जात आहे. भूजल पातळी मोजण्यासाठी जिल्ह्यातील विहिरींची निश्चिती करण्यात आली आहे. या विहिरीतून वर्षातून चार वेळा भूजल पातळी मोजली जाते. त्या आधारावरच सरासरी भूजल पातळी काढली जाते.