म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील सध्याचे वॉटर वेंडिंग मशिन्स बदलण्यात येत असून, त्यांच्या जागी वॉटर पॉइंटच्या रुपाने अत्याधुनिक आरओ मशिन्स बसविण्यात येत आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या मदतीविना या मशिनमध्ये केवळ नाणे टाकून प्रवाशांना शुद्ध पाणी मिळू शकणार आहे. चोवीस तास ही सेवा उपलब्ध राहणार आहे.
नाशिकरोडसह मनमाड, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, देवळाली या स्थानकांमध्ये आरओ मशिन्स बसविण्यात येत आहेत. प्रवाशांना शुद्ध पाणी अत्यंत कमी दरात उपलब्ध करण्यात आले आहे. फन्टुस कंपनीने ही मशिन्स बसविली आहेत. नाशिकरोडच्या प्लॅटफॉर्म एक आणि दोनवर प्रत्येकी दोन मशिन्स बसविण्यात आली आहेत. सर्वांत मोठ्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर एकच मशिन आहे. कारण, तेथे जास्त प्रवासी गाड्या थांबत नाहीत. या मशिन्सचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनमधून दररोज सुमारे पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. त्यांना याचा लाभ होणार आहे.
---
...असे आहेत दर
तीनशे मिलिलिटर आरओ पाणी स्वतःची बाटली असेल, तर एक रुपयात मिळणार आहे. बाटलीसह तेवढेच पाणी दोन रुपयांना मिळेल. पाचशे मिलिलिटर पाणी तीन व पाच रुपयांना मिळेल. एक लिटर पाणी स्वतःची बाटली असेल, तर पाच व बाटलीसह विकत घेतल्यास आठ रुपयांना मिळेल. दोन लिटर पाणी आठ व बारा रुपयांना मिळेल. पाच लिटर पाणी वीस व पंचवीस रुपयांना मिळेल. खासगी विक्रेते एक लिटर पाण्याच्या बाटलीचे वीस रुपये घेतात. शिवाय हे पाणी शुद्ध असेलच याची खात्री नाही. शिवाय बाटलीवर छापील किंमत पंधरा रुपये असतानाही वीस रुपये घेऊन लूट केली जात आहे. त्या तुलनेत संबंधित मशिनवर एक लिटर पाणी पाच रुपयांना उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांकडून त्याचे स्वागत होत आहे.
--
...असे मिळेल पाणी
या मशिनद्वारे स्वतः प्रवासी पैसे टाकून पाणी घेऊ शकतात. एक आणि पाच रुपयांचे नाणे टाकल्यास पाणी मिळते. पाणी शुद्ध कसे होते ते दाखविणाऱ्या आकृत्या मशिनवर आहेत. पाण्यावरच आरोग्य अवलंबून आहे हे अजून उमगले नसल्याने बहुसंख्य प्रवासी मशिनचे पाणी घेण्याचे टाळतात. त्यामुळे येथे पाणी सेवा देणारा कर्मचारी अडकून पडतो. हे लक्षात घेऊन रेल्वेने आताची सर्व आधुनिक मशिन हटवून अत्याधुनिक मशिन बसविण्यास सुरुवात केली आहे. प्लॅटफॉर्म एकवरील मशिन हटवून ते दोनवर हलविण्यात आले आहे. आता त्या जागी अत्याधुनिक मशिन येणार आहे. संबंधित विक्रेत्याकडे मागणी केल्यासही हे पाणी उपलब्ध होईल.
--
छोट्या स्टेशनची काळजी
नाशिकरोड रेल्वे स्टेशन हे ए वन दर्जाचे आहे. नाशिकरोड हद्दीतील ई क्लास दर्जाच्या छोट्या रेल्वे स्टेशनची तृष्णाही भागविण्याची सोय झाली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना आधुनिक प्युरिफायर्सद्वारे शुद्ध केलेले पाणी पिण्यास मिळूही लागले आहे. तहानेने घसा कोरडा पडलेल्या व तहानेने व्याकुळ झालेल्या रेल्वे प्रवाशांनी या सुविधेबद्दल रेल्वेला धन्यवाद दिले आहेत. नाशिकरोड वाणिज्य निरीक्षकांच्या हद्दीतील सात स्थानकांना शुद्ध पाणी देण्याचा श्रीगणेशा झाला आहे. त्यामध्ये घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड आणि उगाव यांचा समावेश आहे. येस बँकेच्या मदतीने हे मशिन बसविण्यात आले आहेत. बँकेने एक वर्षाची देखभालीची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रवाशांची उन्हाळ्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन प्युरिफायरला पाचशे लिटरची टाकी जोडण्यात आली आहे.
--
जलकुंभही उपलब्ध
नाशिकरोड आणि देवळाली कॅम्पसारख्या महत्त्वाच्या स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. त्यासाठी मोठा जलकुंभ आणि वॉटर स्टँड आहेत. ज्यांना मशिन्सचे पाणी नको असेल त्यांना जलकुभांचे पाणी मोफत मिळते. मुंबईला जाताना नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये नाशिकरोड स्थानकात पाणी भरले जाते. अन्य गाड्यांमध्ये भुसावळ येथे पाणी भरले जाते. मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये इगतपुरी स्थानकात पिण्याचे पाणी भरले जाते.
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील सध्याचे वॉटर वेंडिंग मशिन्स बदलण्यात येत असून, त्यांच्या जागी वॉटर पॉइंटच्या रुपाने अत्याधुनिक आरओ मशिन्स बसविण्यात येत आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या मदतीविना या मशिनमध्ये केवळ नाणे टाकून प्रवाशांना शुद्ध पाणी मिळू शकणार आहे. चोवीस तास ही सेवा उपलब्ध राहणार आहे.
नाशिकरोडसह मनमाड, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, देवळाली या स्थानकांमध्ये आरओ मशिन्स बसविण्यात येत आहेत. प्रवाशांना शुद्ध पाणी अत्यंत कमी दरात उपलब्ध करण्यात आले आहे. फन्टुस कंपनीने ही मशिन्स बसविली आहेत. नाशिकरोडच्या प्लॅटफॉर्म एक आणि दोनवर प्रत्येकी दोन मशिन्स बसविण्यात आली आहेत. सर्वांत मोठ्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर एकच मशिन आहे. कारण, तेथे जास्त प्रवासी गाड्या थांबत नाहीत. या मशिन्सचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनमधून दररोज सुमारे पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. त्यांना याचा लाभ होणार आहे.
---
...असे आहेत दर
तीनशे मिलिलिटर आरओ पाणी स्वतःची बाटली असेल, तर एक रुपयात मिळणार आहे. बाटलीसह तेवढेच पाणी दोन रुपयांना मिळेल. पाचशे मिलिलिटर पाणी तीन व पाच रुपयांना मिळेल. एक लिटर पाणी स्वतःची बाटली असेल, तर पाच व बाटलीसह विकत घेतल्यास आठ रुपयांना मिळेल. दोन लिटर पाणी आठ व बारा रुपयांना मिळेल. पाच लिटर पाणी वीस व पंचवीस रुपयांना मिळेल. खासगी विक्रेते एक लिटर पाण्याच्या बाटलीचे वीस रुपये घेतात. शिवाय हे पाणी शुद्ध असेलच याची खात्री नाही. शिवाय बाटलीवर छापील किंमत पंधरा रुपये असतानाही वीस रुपये घेऊन लूट केली जात आहे. त्या तुलनेत संबंधित मशिनवर एक लिटर पाणी पाच रुपयांना उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांकडून त्याचे स्वागत होत आहे.
--
...असे मिळेल पाणी
या मशिनद्वारे स्वतः प्रवासी पैसे टाकून पाणी घेऊ शकतात. एक आणि पाच रुपयांचे नाणे टाकल्यास पाणी मिळते. पाणी शुद्ध कसे होते ते दाखविणाऱ्या आकृत्या मशिनवर आहेत. पाण्यावरच आरोग्य अवलंबून आहे हे अजून उमगले नसल्याने बहुसंख्य प्रवासी मशिनचे पाणी घेण्याचे टाळतात. त्यामुळे येथे पाणी सेवा देणारा कर्मचारी अडकून पडतो. हे लक्षात घेऊन रेल्वेने आताची सर्व आधुनिक मशिन हटवून अत्याधुनिक मशिन बसविण्यास सुरुवात केली आहे. प्लॅटफॉर्म एकवरील मशिन हटवून ते दोनवर हलविण्यात आले आहे. आता त्या जागी अत्याधुनिक मशिन येणार आहे. संबंधित विक्रेत्याकडे मागणी केल्यासही हे पाणी उपलब्ध होईल.
--
छोट्या स्टेशनची काळजी
नाशिकरोड रेल्वे स्टेशन हे ए वन दर्जाचे आहे. नाशिकरोड हद्दीतील ई क्लास दर्जाच्या छोट्या रेल्वे स्टेशनची तृष्णाही भागविण्याची सोय झाली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना आधुनिक प्युरिफायर्सद्वारे शुद्ध केलेले पाणी पिण्यास मिळूही लागले आहे. तहानेने घसा कोरडा पडलेल्या व तहानेने व्याकुळ झालेल्या रेल्वे प्रवाशांनी या सुविधेबद्दल रेल्वेला धन्यवाद दिले आहेत. नाशिकरोड वाणिज्य निरीक्षकांच्या हद्दीतील सात स्थानकांना शुद्ध पाणी देण्याचा श्रीगणेशा झाला आहे. त्यामध्ये घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड आणि उगाव यांचा समावेश आहे. येस बँकेच्या मदतीने हे मशिन बसविण्यात आले आहेत. बँकेने एक वर्षाची देखभालीची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रवाशांची उन्हाळ्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन प्युरिफायरला पाचशे लिटरची टाकी जोडण्यात आली आहे.
--
जलकुंभही उपलब्ध
नाशिकरोड आणि देवळाली कॅम्पसारख्या महत्त्वाच्या स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. त्यासाठी मोठा जलकुंभ आणि वॉटर स्टँड आहेत. ज्यांना मशिन्सचे पाणी नको असेल त्यांना जलकुभांचे पाणी मोफत मिळते. मुंबईला जाताना नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये नाशिकरोड स्थानकात पाणी भरले जाते. अन्य गाड्यांमध्ये भुसावळ येथे पाणी भरले जाते. मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये इगतपुरी स्थानकात पिण्याचे पाणी भरले जाते.