शौचालय नसल्याने विवाहितेची घटस्फोटाची मागणी
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
अभिनेता अक्षय कुमारने टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाच्या माध्यमातून गंमतीशीर पध्दतीने गंभीर विषयाला हात घातला. या चित्रपटाच्या कथेला साजेशी घटना नाशिकमध्ये घडली आहे. लग्न जमण्यापूर्वी विवाहितेने घरात शौचायल बांधण्याची मागणी केली होती. मात्र, लग्न झाल्यावरही घरात शौचालयाचे बांधकाम न झाल्याने विवाहितेने पतीकडे चक्क घटस्फोटाची मागणी केली आहे.
सातपूर येथील स्लम एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वारबाबानगरमधील अनिकेत पगारे (नाव बदलले आहे) याच्या लग्नावेळी नियोजित वधूने घरात शौचालय बांधण्याची मागणी वरपक्षाकडे केली होती. त्यावेळी घरात लवकरच शौचालय बांधणार असे तिला सांगण्यात आले होते. मात्र, लग्नाला दीड वर्षापेक्षा जास्त दिवस होऊनही घरात शौचालय बांधण्यात न आल्याने अखेर पगारे यांच्या पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सौ. पगारे यांच्यासारख्या असंख्य महिलांची शौचालयांअभावी कुचंबणा होत आहे. यामुळे नाशिकमधील या टॉयलेट कथेने पुन्हा एकदा शौचालयाच्या प्रश्नाला गंभीर वळण दिले आहे. अनुदान मिळूनही अनेक जण घरात शौचालय बांधत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
नाशिक हागणदारीमुक्त?
नाशिक महापालिकेला नुकतेच केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानानिमित्त हागणदारीमुक्त म्हणून जाहीर केले. मात्र, नाशिक खरेच हागणदारीमुक्त झाले आहे का? हा प्रश्न या प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकसाठी ही नक्कीच भूषणावह बाब नाही.
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
अभिनेता अक्षय कुमारने टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाच्या माध्यमातून गंमतीशीर पध्दतीने गंभीर विषयाला हात घातला. या चित्रपटाच्या कथेला साजेशी घटना नाशिकमध्ये घडली आहे. लग्न जमण्यापूर्वी विवाहितेने घरात शौचायल बांधण्याची मागणी केली होती. मात्र, लग्न झाल्यावरही घरात शौचालयाचे बांधकाम न झाल्याने विवाहितेने पतीकडे चक्क घटस्फोटाची मागणी केली आहे.
सातपूर येथील स्लम एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वारबाबानगरमधील अनिकेत पगारे (नाव बदलले आहे) याच्या लग्नावेळी नियोजित वधूने घरात शौचालय बांधण्याची मागणी वरपक्षाकडे केली होती. त्यावेळी घरात लवकरच शौचालय बांधणार असे तिला सांगण्यात आले होते. मात्र, लग्नाला दीड वर्षापेक्षा जास्त दिवस होऊनही घरात शौचालय बांधण्यात न आल्याने अखेर पगारे यांच्या पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सौ. पगारे यांच्यासारख्या असंख्य महिलांची शौचालयांअभावी कुचंबणा होत आहे. यामुळे नाशिकमधील या टॉयलेट कथेने पुन्हा एकदा शौचालयाच्या प्रश्नाला गंभीर वळण दिले आहे. अनुदान मिळूनही अनेक जण घरात शौचालय बांधत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
नाशिक हागणदारीमुक्त?
नाशिक महापालिकेला नुकतेच केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानानिमित्त हागणदारीमुक्त म्हणून जाहीर केले. मात्र, नाशिक खरेच हागणदारीमुक्त झाले आहे का? हा प्रश्न या प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकसाठी ही नक्कीच भूषणावह बाब नाही.