आम्ही साऱ्या जणी लोगो - फोटो आहे
- -
युनिक महिला मंडळ
- -
२००९ साली अनिता सतीश सोनवणे यांनी युनिक महिला मंडळाची स्थापना केली. राजीवनगर येथे हे मंडळ कार्यरत आहे. सुमारे १५० महिला सदस्यांचा समावेश असलेले हे मंडळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विविध क्षेत्रात उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. लघुउद्योजिकांना प्रोत्साहन देणे, गरजूंना आर्थिक मदत, भारतीय संस्कृतीची जपणूक, लहानांपासून ज्येष्ठांसाठी उपयुक्त उपक्रम अशा अनेक हेतूने मंडळातील महिला प्रभावी कार्य समाजात करत आहेत.
- -
सामाजिक बांधिलकीची जपणूक
समाजातील अनेक घटकांना मदतीची गरज असते. या घटकांसाठी सामाजिक बांधिलकी जोपासत महिला मंडळ मदत करत असते. हिवाळ्यात पाड्यांवर ज्येष्ठ, लहान मुलांसाठी उबदार कपड्यांचे वाटप केले जाते. नवरात्रोत्सवात देवीच्या समोर महिला ओटी भरतात, त्यात भर घालण्याचे आवाहन करत आदिवासी भागांमध्ये, निरीक्षण गृहात गहू, तांदूळ, कडधान्यांचे वाटप केले जाते. या उपक्रमाच्या पहिल्या वर्षी साडे चार क्विंटल तर दुसऱ्या वर्षी साडे पाच क्विंटल धान्याचे वाटप मंडळाकडून करण्यात आले. याशिवाय, येथील मुलामुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी वही, पेन, पेन्सिल, आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. तसेच दिवाळीत दिवाळीत कपडे, फराळाचे वाटप करण्यात आले. नाशिक येथे आलेल्या पूरात अनेकांचे संसार सावरण्यासाठी कपडे, भांडी, पांघरुणे अशा प्रकारची मदत, केरळ येथे आलेल्या पूरासाठी विविध सामग्री मंडळाने पुरविली होती.
- -
पारंपरिक सण, उत्सवांचा आनंद
दरवर्षी युनिक महिला मंडळाकडून 'संक्रांतोत्सव' साजरा केला जातो. दोन दिवस स्टॉल्स लावून लघुउद्योजिकांना प्रोत्साहन दिले जाते. वाणाच्या वस्तू, तिळगूळ आदींची विक्री येथे केली जाते. गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हे सणदेखील मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. नवरात्रात महिलांसाठी दांडियाचे आयोजन केले जाते. आरती, श्रीसूक्तम्, कुंजिकास्तोत्राचे पठन, केले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. पर्यावरणपूरक गणपती, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजे बंदीचा समावेश या उत्सवात असतो. याविषयी प्रबोधन करण्यासाठी शाळांमध्ये प्रबोधन केले जाते. सर्व पारंपरिक सण, उत्सव आनंदाने साजरे केले जाते.
- -
प्रबोधनातून चांगल्या बदलासाठी प्रयत्न
समाजात शांतता नांदावी, वाहन चालक सुरक्षित राहावे, पर्यावरण संवर्धन व्हावे, यासाठी महिला मंडळाकडून सातत्याने विविध मार्गाने प्रयत्न केले जातात. शाळांमध्ये जाऊन त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली जाते. वृक्षारोपण, रक्तदान, हेल्मेटचा वापर आदी विषयांचा यात समावेश असतो.
- -
महिला मंडळातील सदस्य
अनिता सोनवणे, सुरेखा सोनवणे, मंजुषा पत्की, कल्पना बारसकर, जयश्री महाले, अलका रकिबे, सुवर्णा गांगुर्डे, रेणुका मराठे, प्रिया काळे, प्रिती जैन, सुनिता नंबियार, राजश्री वाघ, सुरेखा सावंत, मीनल हेगडे, अल्बिना शेख, लता शिंदे, नीता किणी, नीता बिडवई, मनिषा खैरनार, वर्षा मुसळे, मनिषा कुलकर्णी, सुजाता कुडे, नाझिया काझी, अदिती वाघमारे, सीमा महाबळ, स्वाती बेलदार, रोहिणी कुलकर्णी, सविता एरंडे, मेघना संधाने
- -
(शब्दांकन - अश्विनी कावळे)
- -
पाठवा तुमच्या मंडळाची माहिती
प्रिय सखी,
आपलंही महिला मंडळ आहे? तुम्हीही विविध प्रकारचे उपक्रम राबवतात? तर मग, आजच आम्हाला त्याविषयी कळवा. आपल्या मंडळाची आजवरची कारकीर्द कशी आहे? आगामी काळाचे नियोजन काय आहे? हे सारे आपण 'आम्ही साऱ्या जणी' या कॉलमसाठी 'मटा'ला कळवू शकता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे व फोटोदेखील यामध्ये अपेक्षित आहे. मंडळाची माहिती ashwini.kawale@timesgroup.com या ई मेल आयडीवर किंवा महाराष्ट्र टाइम्स, तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर पाठवावी. अधिक माहितीसाठी अश्विनी कावळे यांच्याशी ०२५३ - ६६३७९३८ या क्रमांकावर दुपारी १२ वाजेनंतर संपर्क साधावा.
- -