म. टा. वृत्तसेवा, येवला
राज्य सरकारने येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील तृषार्त जनतेचा अधिक अंत न बघता जिल्ह्यातील ‘मांजरपाडा’ प्रकल्पाचे व कालव्याचे काम तत्काळ मार्गी लावावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा कृती समितीच्या येवल्यात झालेल्या एका बैठकीत देण्यात आला.
शनिवारी दुपारी येवला येथील शासकीय विश्रामगृहामध्ये ही बैठक झाली. येवला तालुक्याच्या दुष्काळग्रस्त उत्तर-पूर्व भागातील शेतीसाठी नियोजित मांजरपाडा पाटपाण्याच्या प्रश्नात राजकीय कुरघोडीचा खेळ सुरू असल्याने या प्रकल्पाला कार्यान्वित होण्यासाठी अजून किती वर्ष लागतील? असा संतप्त सवाल देखील कृती समितीच्या या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला.
पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचा प्रश्न म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. गेली अनेक वर्षे चातकासारखी वाट पाहूनही वर्षानुवर्षे या ना त्या कारणाने रेंगाळत पडलेला हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे दसरवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा कृती समितीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. समितीची शनिवारी दुपारी समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बद्रीनाथ कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
पुणेगाव धरणाचे पाणी हे दसरवाडी धरणापर्यंत सोडून चाचणी घेण्यात येणार आहे. याचे श्रेय लाटण्याचे काम येवला तालुक्यातील काहींनी केवळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन चालविले आहे. एका दिवसात उपोषण करून प्रश्न सुटणार होता; तर मग गेल्या ३० वर्षांपासून राज्यातील सत्ता हाती असतांना त्यांना हा प्रश्न का मार्गी लावला नाही?, असा रोखठोक सवाल यावेळी बद्रीनाथ कोल्हे यांनी केला.
पाटपाण्याच्या प्रश्नासाठी कृती समितीने गेल्या १५ ते २० वर्षांपासून सतत पाठपुरावा करून मोर्चा, आंदोलने, धरणे, जनजागृती बैठका, गावोगावी पाणी परिषदा घेऊन हा प्रश्न जनरेटेच्या माध्यमातून पेटता ठेवला होता. कृती समितीच्या ह्या रेट्याची शासनाने वेळोवेळी दखल घेत हे काम थोडे-थोडे का होईना कासव गतीने सुरू आहे.
परंतु ज्या पुढाऱ्यांनी हा प्रश्न हाती घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हात निश्चित यात भाजले आहे, असेही यावेळी समिती सदस्य संजय पगारे म्हणाले. सदस्य संजय मिस्तरी म्हणाले, एखादी गोष्ट होणारच होती, मग त्यासाठी उपोषण करून फायदा काय होता? पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे पाणी येवले तालुक्यात येणार म्हणून ज्या लोकांनी नुकताच गाजावाजा केला, प्रसिद्धीसाठी बातम्या दिल्या. ही गोष्ट जनतेची दिशाभूल करणारी आहे. भ्रष्टाचारी नेत्यांच्या बगलबच्च्या पुढाऱ्यांनी केवळ राजकारण डोक्यात ठेवून हा पाणीप्रश्न हाताळू नये. कारण, गेली १० ते १२ वर्षांपासून हाती सत्ता असतांनाही त्यांनी हा प्रश्न का मार्गी लावला नाही, असा सवाल यावेळी समितीचे ज्येेष्ठ सदस्य भाऊ लहरे यांनी केला.
राज्य सरकारने येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील तृषार्त जनतेचा अधिक अंत न बघता जिल्ह्यातील ‘मांजरपाडा’ प्रकल्पाचे व कालव्याचे काम तत्काळ मार्गी लावावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा कृती समितीच्या येवल्यात झालेल्या एका बैठकीत देण्यात आला.
शनिवारी दुपारी येवला येथील शासकीय विश्रामगृहामध्ये ही बैठक झाली. येवला तालुक्याच्या दुष्काळग्रस्त उत्तर-पूर्व भागातील शेतीसाठी नियोजित मांजरपाडा पाटपाण्याच्या प्रश्नात राजकीय कुरघोडीचा खेळ सुरू असल्याने या प्रकल्पाला कार्यान्वित होण्यासाठी अजून किती वर्ष लागतील? असा संतप्त सवाल देखील कृती समितीच्या या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला.
पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचा प्रश्न म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. गेली अनेक वर्षे चातकासारखी वाट पाहूनही वर्षानुवर्षे या ना त्या कारणाने रेंगाळत पडलेला हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे दसरवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा कृती समितीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. समितीची शनिवारी दुपारी समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बद्रीनाथ कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
पुणेगाव धरणाचे पाणी हे दसरवाडी धरणापर्यंत सोडून चाचणी घेण्यात येणार आहे. याचे श्रेय लाटण्याचे काम येवला तालुक्यातील काहींनी केवळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन चालविले आहे. एका दिवसात उपोषण करून प्रश्न सुटणार होता; तर मग गेल्या ३० वर्षांपासून राज्यातील सत्ता हाती असतांना त्यांना हा प्रश्न का मार्गी लावला नाही?, असा रोखठोक सवाल यावेळी बद्रीनाथ कोल्हे यांनी केला.
पाटपाण्याच्या प्रश्नासाठी कृती समितीने गेल्या १५ ते २० वर्षांपासून सतत पाठपुरावा करून मोर्चा, आंदोलने, धरणे, जनजागृती बैठका, गावोगावी पाणी परिषदा घेऊन हा प्रश्न जनरेटेच्या माध्यमातून पेटता ठेवला होता. कृती समितीच्या ह्या रेट्याची शासनाने वेळोवेळी दखल घेत हे काम थोडे-थोडे का होईना कासव गतीने सुरू आहे.
परंतु ज्या पुढाऱ्यांनी हा प्रश्न हाती घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हात निश्चित यात भाजले आहे, असेही यावेळी समिती सदस्य संजय पगारे म्हणाले. सदस्य संजय मिस्तरी म्हणाले, एखादी गोष्ट होणारच होती, मग त्यासाठी उपोषण करून फायदा काय होता? पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे पाणी येवले तालुक्यात येणार म्हणून ज्या लोकांनी नुकताच गाजावाजा केला, प्रसिद्धीसाठी बातम्या दिल्या. ही गोष्ट जनतेची दिशाभूल करणारी आहे. भ्रष्टाचारी नेत्यांच्या बगलबच्च्या पुढाऱ्यांनी केवळ राजकारण डोक्यात ठेवून हा पाणीप्रश्न हाताळू नये. कारण, गेली १० ते १२ वर्षांपासून हाती सत्ता असतांनाही त्यांनी हा प्रश्न का मार्गी लावला नाही, असा सवाल यावेळी समितीचे ज्येेष्ठ सदस्य भाऊ लहरे यांनी केला.