म. टा. वृत्तसेवा, येवला
स्त्री मनाला भुरळ घालतानाच अगदी सातासमुद्रापार पोहोचलेल्या भरजरी, जरतारी नक्षीदार अशा महाराष्ट्राचे महावस्त्र पैठणीला ‘जीएसटी’चा फटका बसणार आहे. देशभरात एकच करप्रणालीसाठी केंद्र शासनाने आणलेल्या या ‘जीएसटी’त यापूर्वी कोणताही कर नसलेल्या हातमाग उद्योगातील रेशीमवर पाच टक्के कर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य विणकरांची मोठी पंचाईत झाली आहे. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहरातील असंख्य विणकरांना हा ‘जीएसटी’ चांगलाच तापदायक ठरणार असल्याने विणकरांमध्ये चिंता पसरली आहे. विशेषतः येथील बहुसंख्य विणकरांची उलाढाल वीस लाखांच्या आत असल्यामुळे त्यांना जीएसटी रजिस्ट्रेशन असणार नाही, पर्यायाने त्यांना जीएसटीचा परतावाही मिळणार नसल्याने साहजिकच येत्या काळात रेशमी धाग्याची ही पैठणी महागणार आहे.
येवला शहरामध्ये जवळपास आठ हजारांच्या आसपास हातमाग असून, त्यावर सुमारे दहा हजारांहून अधिक विणकर हे पैठणी वस्त्र विणण्याचे काम करतात. यापूर्वी पैठणी विणकामासाठी कुठलाही कर नसलेला कच्चा माल उपलब्ध होत होता. मात्र एक जुलैपासून पैठणीसाठीच्या विणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या रेशीमवर ‘जीएसटी’ लागणार आहे. रेशीमच्या कोष व कच्च्या धाग्यावर ‘जीएसटी’ नसला तरी तो या पैठणी विणकामासाठी लागणाऱ्या तीनतारी रेशीमवर पाच टक्के आकारण्यात येणार आहे. परिणामी रेशमाचे भाव वाढताना साहजिकच पैठणी देखील किंमतीच्या बाबतीत पूर्वीच्या तुलनेत अधिक भाव खाणार आहे. परिणामी पुढील काळात पैठणीवर नजर ठेवून असणाऱ्या स्त्रियांना अधिकचे दाम मोजावे लागणार आहेत.
नोंदणी नसल्यामुळे परतावाही नाही
कोष व त्यापासून बनवलेल्या धाग्यावर जीएसटी नाही. मात्र, जो तीनतार बनवणार आहे त्याचेवर जीएसटी आहे. त्याचमुळे रेशमाचे भाव हे पाच टक्के वाढणार आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य पैठणी विणकरांना बसणार आहे. विणकरांची उलाढाल वीस लाखांच्या आत असल्याने त्यांचे जीएसटी रजिस्ट्रेशन नसणार व पर्यायाने त्यांनी रेशीम व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या रेशमावरील जीएसटीचा परतावा त्यांना मिळणार नसल्याचे आज तरी दिसत आहे.
स्त्री मनाला भुरळ घालतानाच अगदी सातासमुद्रापार पोहोचलेल्या भरजरी, जरतारी नक्षीदार अशा महाराष्ट्राचे महावस्त्र पैठणीला ‘जीएसटी’चा फटका बसणार आहे. देशभरात एकच करप्रणालीसाठी केंद्र शासनाने आणलेल्या या ‘जीएसटी’त यापूर्वी कोणताही कर नसलेल्या हातमाग उद्योगातील रेशीमवर पाच टक्के कर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य विणकरांची मोठी पंचाईत झाली आहे. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहरातील असंख्य विणकरांना हा ‘जीएसटी’ चांगलाच तापदायक ठरणार असल्याने विणकरांमध्ये चिंता पसरली आहे. विशेषतः येथील बहुसंख्य विणकरांची उलाढाल वीस लाखांच्या आत असल्यामुळे त्यांना जीएसटी रजिस्ट्रेशन असणार नाही, पर्यायाने त्यांना जीएसटीचा परतावाही मिळणार नसल्याने साहजिकच येत्या काळात रेशमी धाग्याची ही पैठणी महागणार आहे.
येवला शहरामध्ये जवळपास आठ हजारांच्या आसपास हातमाग असून, त्यावर सुमारे दहा हजारांहून अधिक विणकर हे पैठणी वस्त्र विणण्याचे काम करतात. यापूर्वी पैठणी विणकामासाठी कुठलाही कर नसलेला कच्चा माल उपलब्ध होत होता. मात्र एक जुलैपासून पैठणीसाठीच्या विणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या रेशीमवर ‘जीएसटी’ लागणार आहे. रेशीमच्या कोष व कच्च्या धाग्यावर ‘जीएसटी’ नसला तरी तो या पैठणी विणकामासाठी लागणाऱ्या तीनतारी रेशीमवर पाच टक्के आकारण्यात येणार आहे. परिणामी रेशमाचे भाव वाढताना साहजिकच पैठणी देखील किंमतीच्या बाबतीत पूर्वीच्या तुलनेत अधिक भाव खाणार आहे. परिणामी पुढील काळात पैठणीवर नजर ठेवून असणाऱ्या स्त्रियांना अधिकचे दाम मोजावे लागणार आहेत.
नोंदणी नसल्यामुळे परतावाही नाही
कोष व त्यापासून बनवलेल्या धाग्यावर जीएसटी नाही. मात्र, जो तीनतार बनवणार आहे त्याचेवर जीएसटी आहे. त्याचमुळे रेशमाचे भाव हे पाच टक्के वाढणार आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य पैठणी विणकरांना बसणार आहे. विणकरांची उलाढाल वीस लाखांच्या आत असल्याने त्यांचे जीएसटी रजिस्ट्रेशन नसणार व पर्यायाने त्यांनी रेशीम व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या रेशमावरील जीएसटीचा परतावा त्यांना मिळणार नसल्याचे आज तरी दिसत आहे.