अ‍ॅपशहर

सरकारी अनास्थेला कंटाळून सोडले गाव

शिधापत्रिकेवर धान्य नाही, दारिद्रय रेषेखाली असूनही घरकुलाचा लाभ नाही यासर्व प्रकाराला कंटाळून आपण कुटुंबीयांसह गाव सोडून जात आहोत.

Maharashtra Times 13 Oct 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम young man leave village
सरकारी अनास्थेला कंटाळून सोडले गाव


शिधापत्रिकेवर धान्य नाही, दारिद्रय रेषेखाली असूनही घरकुलाचा लाभ नाही यासर्व प्रकाराला कंटाळून आपण कुटुंबीयांसह गाव सोडून जात आहोत. १५ दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास गावातल्या मारुती मंदिरासमोर आत्मदहन करू, अशा आशयाचे निवेदन चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील बाळकृष्ण नथू देवरे या तरुणाने दिले आहे. बाळकृष्‍ण याने सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे निवेदन देवून गाव सोडले आहे.

बाळकृष्ण यांचा दरेगाव येथे शेती व टेलरिंग व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या होरपळबाबत

जिल्हाधिकारी यांच्याकडेही कैफियत मांडली. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. तसेच तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांनीही आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असे त्याने निवेदनात म्हटले आहे. दारिद्र्य रेषेखाली असून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही. शिधा पत्रिकेवर धान्य मिळत नाही.

त्यामुळे आपण पत्नी, दोन मुली, मुलगासह गाव सोडून जात असल्याचे देवरे यांनी निवेदनात म्हंटले आहे. तसेच १५ दिवसात न्याय न मिळाल्यास गावात येऊन मारुती मंदिरासमोर आत्मदहन करू, असा इशाराही देवरे यांनी दिला आहे. बाळकृष्ण यांच्या या अनोख्या निवेदनामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज