मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई
करोनासंकट आणि संसर्ग साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनचा परिणाम अनेक घटकांवर झाला. आर्थिक झळ सोसावी लागली. आता त्याचा फटका बासमती तांदळालाही बसला आहे. बासमती तांदळाच्या मागणीत घट झाल्यामुळे त्याचा उठाव कमी झाला आहे. परिणामी, घाऊक अन्नधान्य बाजारात गेल्यावर्षी १०० ते १५० रुपये किलोपर्यंत असलेला बासमती तांदूळ सध्या ६५ ते ७५ रुपये किलो झाला आहे. गेल्या पाच वर्षांतील ही तांदळाच्या दराची सर्वांत मोठी घसरण आहे.
तांदूळ हा सर्वांच्या जेवणातील मुख्य घटक आहे. प्रत्येक घरात किमान एका वेळी तरी भात खाल्ला जातोच. त्यामुळे तांदळाला बाजारात मोठी मागणी आहे. दिवाळी झाली की शेतातील कापून ठेवलेल्या भात पिकातून तांदूळ बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात नवा तांदूळ यायला सुरुवात होते. यात बासमती, दुबार, तिबार, मोगरा, कोलम, मसुरी, आंबेमोहर, परिमल या तांदळाच्या जातींचा समावेश आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तांदळाची मोठ्या प्रमाणात मे महिन्यापर्यंत आवक होत असते. तर इतर महिन्यात कमी जास्त प्रमाणात तांदूळ येत असतो.
सध्या घाऊक बाजारात पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून तांदळाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातून काही प्रमाणात गोंदिया, चंद्रपूरहून तांदूळ घाऊक बाजारात येतो. या बाजारात तांदळाची मासिक आवक सरासरी तीन ते चार लाख क्विंटल इतकी आहे. तर यामध्ये बासमती तांदळाची आवक ५५ ते ६० हजार क्विंटल इतकी होते. साठवणीसाठी नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान तांदळाची जास्त खरेदी केली जाते. तर मार्च ते मे महिन्यात लग्नसराई असल्याने या काळात खरेदी मोठ्या प्रमाणात होते. बासमतीला याच काळात मोठी मागणी असते. मात्र, लॉकडाउनमुळे उत्सव, कार्यक्रमांना परवानगीच नसल्याने बासमतीची मागणी घटली आहे. हॉटेल व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळे पूर्वीसारखे ग्राहक खरेदी करत नाहीत. त्यातच निर्यातही थंडावली आहे. परिणामी मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. घाऊक बाजारात १०० ते १५० रुपये किलो असणारा बासमती तांदूळ सध्या ६५ ते ७५ रुपये किलो झाला आहे. हा तांदूळ पूर्वी ८० ते १०० रुपये किलोने विक्री होत होता.
मुंबईत जिथे बासमती तांदळाच्या १०० गाड्या घाऊक बाजारातून जात होत्या. त्या ठिकाणी आता फक्त १० गाड्या जात आहेत. लॉकडाउनमुळे हॉटेल, लग्नसमारंभ, व्यवसाय मोठे कार्यक्रम यावर मर्यादा आहे. त्यामुळे बासमतीची मागणी कमी झाली आहे. परिणामी दर कमी झाले आहेत.
- अमृतलाल जैन, सचिव, ग्रेन राइस ऑइल मर्चंट असोसिएशन (ग्रोमा)
करोनासंकट आणि संसर्ग साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनचा परिणाम अनेक घटकांवर झाला. आर्थिक झळ सोसावी लागली. आता त्याचा फटका बासमती तांदळालाही बसला आहे. बासमती तांदळाच्या मागणीत घट झाल्यामुळे त्याचा उठाव कमी झाला आहे. परिणामी, घाऊक अन्नधान्य बाजारात गेल्यावर्षी १०० ते १५० रुपये किलोपर्यंत असलेला बासमती तांदूळ सध्या ६५ ते ७५ रुपये किलो झाला आहे. गेल्या पाच वर्षांतील ही तांदळाच्या दराची सर्वांत मोठी घसरण आहे.
तांदूळ हा सर्वांच्या जेवणातील मुख्य घटक आहे. प्रत्येक घरात किमान एका वेळी तरी भात खाल्ला जातोच. त्यामुळे तांदळाला बाजारात मोठी मागणी आहे. दिवाळी झाली की शेतातील कापून ठेवलेल्या भात पिकातून तांदूळ बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात नवा तांदूळ यायला सुरुवात होते. यात बासमती, दुबार, तिबार, मोगरा, कोलम, मसुरी, आंबेमोहर, परिमल या तांदळाच्या जातींचा समावेश आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तांदळाची मोठ्या प्रमाणात मे महिन्यापर्यंत आवक होत असते. तर इतर महिन्यात कमी जास्त प्रमाणात तांदूळ येत असतो.
सध्या घाऊक बाजारात पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून तांदळाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातून काही प्रमाणात गोंदिया, चंद्रपूरहून तांदूळ घाऊक बाजारात येतो. या बाजारात तांदळाची मासिक आवक सरासरी तीन ते चार लाख क्विंटल इतकी आहे. तर यामध्ये बासमती तांदळाची आवक ५५ ते ६० हजार क्विंटल इतकी होते. साठवणीसाठी नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान तांदळाची जास्त खरेदी केली जाते. तर मार्च ते मे महिन्यात लग्नसराई असल्याने या काळात खरेदी मोठ्या प्रमाणात होते. बासमतीला याच काळात मोठी मागणी असते. मात्र, लॉकडाउनमुळे उत्सव, कार्यक्रमांना परवानगीच नसल्याने बासमतीची मागणी घटली आहे. हॉटेल व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळे पूर्वीसारखे ग्राहक खरेदी करत नाहीत. त्यातच निर्यातही थंडावली आहे. परिणामी मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. घाऊक बाजारात १०० ते १५० रुपये किलो असणारा बासमती तांदूळ सध्या ६५ ते ७५ रुपये किलो झाला आहे. हा तांदूळ पूर्वी ८० ते १०० रुपये किलोने विक्री होत होता.
मुंबईत जिथे बासमती तांदळाच्या १०० गाड्या घाऊक बाजारातून जात होत्या. त्या ठिकाणी आता फक्त १० गाड्या जात आहेत. लॉकडाउनमुळे हॉटेल, लग्नसमारंभ, व्यवसाय मोठे कार्यक्रम यावर मर्यादा आहे. त्यामुळे बासमतीची मागणी कमी झाली आहे. परिणामी दर कमी झाले आहेत.
- अमृतलाल जैन, सचिव, ग्रेन राइस ऑइल मर्चंट असोसिएशन (ग्रोमा)