मुंबईः म्हाडाच्या भविष्यातील सर्वच गृहप्रकल्पात पोलिसांसाठी १० टक्के घरे राखीव ठेवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा गुरुवारी करण्यात आली. गोरेगावमधील गेली १२ वर्षे रखडलेल्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी करताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या पुढील सोडतीत पोलिसांना घरे मिळण्याबाबत भूमिका घेतली. तसेच, पत्रा चाळीतील ६७२ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासंदर्भात, राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल १५ दिवसात सादर होणे अपेक्षित असल्याचेही नमूद केले.
पोलिसांना १० टक्के घरे
मुंबईः म्हाडाच्या भविष्यातील सर्वच गृहप्रकल्पात पोलिसांसाठी १० टक्के घरे राखीव ठेवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा गुरुवारी करण्यात आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2020, 4:00 am