अ‍ॅपशहर

नवी मुंबई: ७ स्कूलबस पेटल्या, जीवितहानी नाही

नवी मुंबईतील नेरूळ पश्चिम येथील करावे गावाजवळ उभ्या असलेल्या ७ शाळेच्या बसना आज पहाटेच्या सुमाराला अचानक आग लागल्याचे उघड झाले आहे. उभ्या असलेल्या बसमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. ही घटना पहाटे ४ वाजण्याच्या सुमाराला घडली. यावेळी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

Maharashtra Times 15 Oct 2017, 11:21 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 school buses burnt in nerul navi mumbai no casualty reported
नवी मुंबई: ७ स्कूलबस पेटल्या, जीवितहानी नाही


नवी मुंबईतील नेरूळ पश्चिम येथील करावे गावाजवळ उभ्या असलेल्या ७ शाळेच्या बसना आज पहाटेच्या सुमाराला अचानक आग लागल्याचे उघड झाले आहे. उभ्या असलेल्या बसमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. ही घटना पहाटे ४ वाजण्याच्या सुमाराला घडली. यावेळी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

या सर्व बसेस ज्ञानदीप शाळेच्या असल्याचे वृत्त आहे. आज रविवार असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

स्फोट होऊन एका बसला आग लागल्यानंतर ही आग बाजुला उभ्या असलेल्या बसपर्यंत पसरली आणि बघता बघता सात बस जळून खाक झाल्या. वेळीच आग आटोक्यात आणल्याने ती बाजूच्या वस्तीमध्ये पसरली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज