'राज्यपालांची मदत अत्यंत तुटपुंजी'
'राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून, त्यात मशागतीचा खर्चसुद्धा त्यातून निघणार नाही. त्यामुळे राज्यपालांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. तसेच मदतीत भरीव वाढ करावी,' अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली, तर शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, ही मदत तुटपुंजी आहे. मात्र, प्रशासनाने तातडीने ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
.............