म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने घेण्यात येणारे १५वे आगरी साहित्य संमेलन या वर्षी सातासमुद्रापार म्हणजेच मॉरिशसमध्ये २५ ते २७ फेब्रुवारी २०१७ या दरम्यान होत आहे. वाशीमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत आगरी साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष मोहन भोईर यांनी ही घोषणा केली.
या संमेलनामध्ये कवीवर्य अशोक नायगवाकर, कवी अरुण म्हात्रे, कवी डॉ. मेहश केळुस्कर, डॉ. विश्वास मेहंदळे यांचा सहभाग असेल. संमेलनामध्ये स्थानिक साहित्य दिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी आगरी संस्कृतीचा भाग असणारे भजन कीर्तन, कवी संमेलन, मराठी आगरी बोली भाषेवर चर्चा केली जाणार आहे. तर, आगरी पारंपरिक गीते, आगरी पुस्तके यावरही चर्चा केली जाणार आहे.
यामध्ये तेथील कवी-लेखकांचाही मोलाचा सहभाग लाभणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एकूण ३५ साहित्यिकांनी सहभागी होण्यासाठी नावे नोंदविली आहेत. ज्या साहित्यिकांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९९६७० ७२५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने घेण्यात येणारे १५वे आगरी साहित्य संमेलन या वर्षी सातासमुद्रापार म्हणजेच मॉरिशसमध्ये २५ ते २७ फेब्रुवारी २०१७ या दरम्यान होत आहे. वाशीमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत आगरी साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष मोहन भोईर यांनी ही घोषणा केली.
या संमेलनामध्ये कवीवर्य अशोक नायगवाकर, कवी अरुण म्हात्रे, कवी डॉ. मेहश केळुस्कर, डॉ. विश्वास मेहंदळे यांचा सहभाग असेल. संमेलनामध्ये स्थानिक साहित्य दिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी आगरी संस्कृतीचा भाग असणारे भजन कीर्तन, कवी संमेलन, मराठी आगरी बोली भाषेवर चर्चा केली जाणार आहे. तर, आगरी पारंपरिक गीते, आगरी पुस्तके यावरही चर्चा केली जाणार आहे.
यामध्ये तेथील कवी-लेखकांचाही मोलाचा सहभाग लाभणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एकूण ३५ साहित्यिकांनी सहभागी होण्यासाठी नावे नोंदविली आहेत. ज्या साहित्यिकांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९९६७० ७२५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.