अ‍ॅपशहर

नवी मुंबई हादरली! आईने लेकरांवरच केला अघोरी प्रकार, चिमुरड्यांना संपवून पुढे जे केलं ते भयंकरच...

Navi Mumbai Crime News : अघोरी प्रकारातून गुन्हे होण्याचे प्रकार वाढत चालले आहे. अशात आता नवी मुंबईला हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. इथं एका आईने आपल्या दोन लेकरांचा जीव घेतला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Oct 2022, 9:16 am
नवी मुंबई : राज्यात एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे अंधश्रद्धेतूनही गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नवी मुंबईमध्ये समोर आला आहे. नवी मुंबईत आईनेच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घणसोलीमध्ये घडला आहे. अघोरी कृत्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. नवरा बायकोच्या भांडणांमधून आईनेच आपल्या दोन मुलांची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ghansoli crime news today in marathi


मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील घणसोली इथं आईने आपल्या दोन मुलांचा चाकूने खून केला आणि यानंतर तिने स्वत:ला पंख्याला गळफास घेतला. पण पंखा तुटल्यामुळे आईचा जीव वाचल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. आवाज होताच इमारतीतील बाकीचे लोक घरी धावत आले. यानंतर घरात चार वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

१४०जणांचा जीव घेणारा मोरबीचा पूल कसा कोसळला; अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यामुळं खळबळ
याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता तर आईलाही उपचारासाठी वाशीतल्या महानगरपालिका रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. वडील घरी नसल्याचा फायदा घेत आईने हा प्रकार केला. दरम्यान, मुलाचा २८ ऑक्टोबरलाच पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता. सगळे सुरळीत असतानाही आईने अशा प्रकारचा गंभीर गुन्हा का केला? याबद्दल आता रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज