अ‍ॅपशहर

जोडीदाराच्या निवडीसाठी संवादशाळा

लग्न जुळवण्यासाठी केले जाणारे पारंपारिक प्रयत्न म्हणजेच पत्रिका, कांदापोहे, फोटो हे प्रकार बाजूला ठेवून पत्रिकेतील गुणांपेक्षा मने जुळतात की नाही हे पाहणे, लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या दोघांचे विचार समजून निर्णय घेणे आवश्यक आहे. ही संकल्पना घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रभर ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा उपक्रम राबविते आहे. खारघरमध्ये या उपक्रमाअंतर्गत संवादशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra Times 12 Jul 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम andhashraddha nirmulan samiti organised conversation for unmarried youngsters
जोडीदाराच्या निवडीसाठी संवादशाळा


लग्न जुळवण्यासाठी केले जाणारे पारंपारिक प्रयत्न म्हणजेच पत्रिका, कांदापोहे, फोटो हे प्रकार बाजूला ठेवून पत्रिकेतील गुणांपेक्षा मने जुळतात की नाही हे पाहणे, लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या दोघांचे विचार समजून निर्णय घेणे आवश्यक आहे. ही संकल्पना घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रभर ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा उपक्रम राबविते आहे. खारघरमध्ये या उपक्रमाअंतर्गत संवादशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सेक्टर ७ येथील सत्याग्रह बीएड कॉलेज येथे १६ जुलै रोजी ही संवादशाळा होणार आहे.

लग्न करू इच्छिणारे तरुण-तरुणी तसेच, त्यांच्या पालकांसाठी आयोजित केलेल्या या संवादशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पालकांची चिंता दूर होऊन लग्नाबद्दल मुलामुलींमधील असलेली भीती दूर करण्यासाठी, पालक आणि मुलांमध्ये संवाद साधण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्रभर १० वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अनेक लग्न या उपक्रमातून जुळल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खारघर शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

एक दिवसाची ही कार्यशाळा सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. अधिक माहिती व पूर्वनोंदणीसाठी ७७३८१ ८११७७ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन अंनिसच्या कार्यकर्त्या तेजल कांबळे यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज