मुंबई : अंधश्रद्धेची कीड समाजामधून समूळ नष्ट करण्यासाठी भरीव योगदान देत डोळस विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संघटनेच्या कामाचा लेखाजोखा मांडण्याचे ठरवले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनापासून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या समितीच्या कामाचा तीन दशकांच्या वाटचालीचा प्रवास या निमित्ताने मुंबईत ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ. एन. डी. पाटील, बॉब चर्चिल, बी. स्टेफॅनो, डॉ. के.वीरमणी, डॉ. जब्बार पटेल, डॉ. अनिल काकोडकर, उत्तम निरौला, प्रा. एस.चॅटर्जी, डॉ. नरेंद्र नायक आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
‘अंनिस’ची परिषद
अंधश्रद्धेची कीड समाजामधून समूळ नष्ट करण्यासाठी भरीव योगदान देत डोळस विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Aug 2019, 4:00 am