म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
शहराची घनकचरा व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित ठेवणे आवश्यक आहे. तुर्भे येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प २०११ साली सुरू झाला असून प्रकल्पाचा एकात्मिक विकास करण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडला होता. यावेळी या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली. या कामासाठी सुमारे १५ कोटी ८८ लाख रुपये खर्च होणार आहे.
नवी मुंबई शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याचे तुर्भे येथील डम्पिंग ग्राऊंड येथे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पांचा एकात्मिक विकास करण्यात येणार असून प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत कंपोस्ट खत तयार करण्यासाठी शेड बांधणे, सद्यस्थितीमधील पावसाळी पाणी वाहून नेणारे गटार बांधणे, फ्लम कीट रिटेनिंग वॉल बांधणे, प्रकल्पांमध्ये काँक्रीट रस्ता बांधणे, प्रकल्पातील इमारतींची दुरुस्ती करणे, प्रकल्पांमधील शौचालये अपुरी पडत असल्याने त्यांची संख्या वाढवणे, विद्युत व्यवस्थेची दुरुस्ती करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे १५ कोटी ८८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला जात आहे.
शहराची घनकचरा व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित ठेवणे आवश्यक आहे. तुर्भे येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प २०११ साली सुरू झाला असून प्रकल्पाचा एकात्मिक विकास करण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडला होता. यावेळी या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली. या कामासाठी सुमारे १५ कोटी ८८ लाख रुपये खर्च होणार आहे.
नवी मुंबई शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याचे तुर्भे येथील डम्पिंग ग्राऊंड येथे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पांचा एकात्मिक विकास करण्यात येणार असून प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत कंपोस्ट खत तयार करण्यासाठी शेड बांधणे, सद्यस्थितीमधील पावसाळी पाणी वाहून नेणारे गटार बांधणे, फ्लम कीट रिटेनिंग वॉल बांधणे, प्रकल्पांमध्ये काँक्रीट रस्ता बांधणे, प्रकल्पातील इमारतींची दुरुस्ती करणे, प्रकल्पांमधील शौचालये अपुरी पडत असल्याने त्यांची संख्या वाढवणे, विद्युत व्यवस्थेची दुरुस्ती करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे १५ कोटी ८८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला जात आहे.