म. टा. वृत्तसेवा, पनवेल
महावितरणच्या असंख्य तक्रारींचा पाढा बुधवारी पनवेलच्या वीजग्राहकांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे मांडला. तब्बल पाच तासांहून अधिक वेळ सुरू असलेला दरबार आटोपता घेतल्यानंतर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात सर्वात जास्त खराब काम पनवेलमध्ये असल्याची कबुली दिली. अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांना पनवेलची परिस्थिती सुधारण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मंत्र्यांनी दिला असून तीन महिन्यांनंतर ते पुन्हा पनवेलमध्ये जनता दरबार घेणार आहेत.
बुधवारी दुपारी दोन वाजता खांदा कॉलनीतील श्री कृपा हॉलमध्ये आयोजित केलेला ग्राहकांशी संवाद कार्यक्रम तीन वाजता सुरू झाला. कॅबिनेटची बैठक असल्यामुळे मंत्री तीन वाजता खांदा कॉलनीत पोहोचले. सभागृहात पोहोचताच औपचारिकता न करता माइक हातात घेऊन बावनकुळे यांनी ग्राहकांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. तळोजा औद्योगिक वसाहतीत वीज खंडित होण्याच्या प्रश्नाने संवादाची सुरुवात झाली. पहिल्याच प्रश्नापासून बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली. वारंवार वीज खंडित होणे, दर मंगळवारी देखभाल दुरुस्तीसाठी शटडाऊन, सरासरी विजबिले, जुने पोल न बदलणे, कामात हलगर्जी अशा अनेक तक्रारी पनवेलमधील वीजग्राहकांनी ऊर्जामंत्र्यांसमोर मांडल्या. मी महाराष्ट्रात यावर्षी १५ जनता दरबार घेतले, मात्र पनवेलची परिस्थिती फारच वाईट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना उघडपणे सरकारी काम करता की बिल्डरसाठी काम करता, असा सवाल करीत दोन वेतनवाढ थांबवा, इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची तातडीने बदली करण्याचे आदेश देऊन मंत्री बावनकुळे यांनी उपस्थितांना खूश केले. प्रत्येक प्रश्नावर अधिकाऱ्यांकडून खुलासा मागत हे काम किती दिवसांत पूर्ण होईल, असा जाब त्यांनी विचारला.
पनवेलमध्ये दर मंगळवारी वीजपुरवठा खंडित केला जातो, हे ऐकून बावनकुळे यांनी यापुढे महिन्यातील पहिला मंगळवार शटडाऊन घेऊन कामे करायची, असे आदेश दिले. मंत्र्यांसमोर उत्तरे देताना महावितरणच्या संचालकांपासून कनिष्ठ अभियंत्यापर्यंत अनेकांची बोबडी वळाल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. या सगळ्यावर बोलताना बावनकुळे यांनी आमच्या महावितरणने काम केले नाही, अशी कबुली दिली. मागील सरकारप्रमाणे हे सरकार नाही. आता तुम्हाला काम करावेच लागेल. महिन्याच्या ३० तारखेला स्थानिक आमदारांना रिपोर्ट द्यायचा, असे त्यांनी सांगितले.
बदलीवरून माघार
मंत्रिमहोदयांनी जनतेसमोर दोन इंजिनीअरची वेतनवाढ रोखली, दोन अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिल्याने उपस्थित वीजग्राहकांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले. संबंधितांशी चालू कार्यक्रमातून फोनवरून संपर्क साधून बदलीच्या ऑर्डर काढण्यास सांगितले. पत्रकार परिषदेत मात्र मंत्र्यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देऊन चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
महावितरणच्या असंख्य तक्रारींचा पाढा बुधवारी पनवेलच्या वीजग्राहकांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे मांडला. तब्बल पाच तासांहून अधिक वेळ सुरू असलेला दरबार आटोपता घेतल्यानंतर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात सर्वात जास्त खराब काम पनवेलमध्ये असल्याची कबुली दिली. अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांना पनवेलची परिस्थिती सुधारण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मंत्र्यांनी दिला असून तीन महिन्यांनंतर ते पुन्हा पनवेलमध्ये जनता दरबार घेणार आहेत.
बुधवारी दुपारी दोन वाजता खांदा कॉलनीतील श्री कृपा हॉलमध्ये आयोजित केलेला ग्राहकांशी संवाद कार्यक्रम तीन वाजता सुरू झाला. कॅबिनेटची बैठक असल्यामुळे मंत्री तीन वाजता खांदा कॉलनीत पोहोचले. सभागृहात पोहोचताच औपचारिकता न करता माइक हातात घेऊन बावनकुळे यांनी ग्राहकांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. तळोजा औद्योगिक वसाहतीत वीज खंडित होण्याच्या प्रश्नाने संवादाची सुरुवात झाली. पहिल्याच प्रश्नापासून बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली. वारंवार वीज खंडित होणे, दर मंगळवारी देखभाल दुरुस्तीसाठी शटडाऊन, सरासरी विजबिले, जुने पोल न बदलणे, कामात हलगर्जी अशा अनेक तक्रारी पनवेलमधील वीजग्राहकांनी ऊर्जामंत्र्यांसमोर मांडल्या. मी महाराष्ट्रात यावर्षी १५ जनता दरबार घेतले, मात्र पनवेलची परिस्थिती फारच वाईट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना उघडपणे सरकारी काम करता की बिल्डरसाठी काम करता, असा सवाल करीत दोन वेतनवाढ थांबवा, इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची तातडीने बदली करण्याचे आदेश देऊन मंत्री बावनकुळे यांनी उपस्थितांना खूश केले. प्रत्येक प्रश्नावर अधिकाऱ्यांकडून खुलासा मागत हे काम किती दिवसांत पूर्ण होईल, असा जाब त्यांनी विचारला.
पनवेलमध्ये दर मंगळवारी वीजपुरवठा खंडित केला जातो, हे ऐकून बावनकुळे यांनी यापुढे महिन्यातील पहिला मंगळवार शटडाऊन घेऊन कामे करायची, असे आदेश दिले. मंत्र्यांसमोर उत्तरे देताना महावितरणच्या संचालकांपासून कनिष्ठ अभियंत्यापर्यंत अनेकांची बोबडी वळाल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. या सगळ्यावर बोलताना बावनकुळे यांनी आमच्या महावितरणने काम केले नाही, अशी कबुली दिली. मागील सरकारप्रमाणे हे सरकार नाही. आता तुम्हाला काम करावेच लागेल. महिन्याच्या ३० तारखेला स्थानिक आमदारांना रिपोर्ट द्यायचा, असे त्यांनी सांगितले.
बदलीवरून माघार
मंत्रिमहोदयांनी जनतेसमोर दोन इंजिनीअरची वेतनवाढ रोखली, दोन अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिल्याने उपस्थित वीजग्राहकांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले. संबंधितांशी चालू कार्यक्रमातून फोनवरून संपर्क साधून बदलीच्या ऑर्डर काढण्यास सांगितले. पत्रकार परिषदेत मात्र मंत्र्यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देऊन चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.