मुंबई : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक यापैकी एका क्षेत्रात सर्जनशील आणि मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा हा सन्मान मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष सय्यदभाई यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तलाकपीडित मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देत असतानाच त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या कामाची धुरा सय्यदभाई यांनी सांभाळली. त्यांनी त्रिवार तलाक बंद व्हावा, यासाठीही मोठा लढा दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने त्यांची निवड केली.
चतुरंग जीवनगौरव सय्यदभाई यांना
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक यापैकी एका क्षेत्रात सर्जनशील आणि मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा जीवनगौरव पुरस्काराने ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2019, 4:00 am