अ‍ॅपशहर

काँग्रेस, राष्ट्रवादीकडे उमेदवारांची वानवा

शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाआघाडी महापालिकेत भाजपविरोधात लढण्यासाठी उतरली आहे. महाआघाडीत जागावाटप झाले असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे त्यांच्यावर शेकापच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्याची वेळ ओढवली आहे. शेकापचे पाच कार्यकर्ते काँग्रेसच्या तर सहा कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभे करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे महाआघाडी असली तरी त्यांची ताकद फारच लहान असल्याचे उघड झाले आहे.

Maharashtra Times 8 May 2017, 3:00 am
कुणाल लोंढे, पनवेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress nationalist party dont have contestant to fight panvel election
काँग्रेस, राष्ट्रवादीकडे उमेदवारांची वानवा


शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाआघाडी महापालिकेत भाजपविरोधात लढण्यासाठी उतरली आहे. महाआघाडीत जागावाटप झाले असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे त्यांच्यावर शेकापच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्याची वेळ ओढवली आहे. शेकापचे पाच कार्यकर्ते काँग्रेसच्या तर सहा कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभे करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे महाआघाडी असली तरी त्यांची ताकद फारच लहान असल्याचे उघड झाले आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन पक्षांची महाआघाडी झाली आहे. भाजपचा वारू रोखण्यासाठी बलवान असूनही शेकापने जोखीम न पत्करता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेतले. जागावाटपात काँग्रेसला १८, राष्ट्रवादीला १२ जागा मिळाल्या, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र आपली ताकद ओळखून दोन्ही पक्षांनी एक पाऊल मागे घेऊन शेकापला लढण्याची संधी दिली आहे. काँग्रेसच्या वाट्याच्या १८ पैकी पाच जागांवर शेकापचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ जागांपैकी तब्बल निम्म्या म्हणजेच सात जागांवर शेकापच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कपबशीचा जोरात प्रचार करीत असलेल्या शेकाप नेत्यांना काँग्रेसच्या पंजाला आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाला मत मागण्याची वेळ येणार आहे. महाआघाडीत मित्रपक्षांची इज्जत रहावी म्हणून ही नामी शक्कल लढविण्यात आली आहे. यामध्ये शेकापच्या प्रभाग नऊमधील उमेदवार चंद्रकला शेळके, कामोठे येथील ललिता सखाराम पाटील, कळंबोलीत प्रभाग १०मध्ये सरस्वती काथारा यांच्यासह तीन ठिकाणी शेकापचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे आहेत. तर, उषा शितोळे, कुसूम काळे या दिग्गज उमेदवारांसह सहाजण काँग्रेसच्या पंजाच्या निशाणीवर निवडणुकीत उतरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळत नसूनही पक्षांची लाज राखण्यासाठी शेकापच्या नेत्यांनी ही शक्कल लढवली आहे. शेकापचे राजकीय ताकद असलेल्या भागांत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तिकिटांवर उमेदवारी दिले आहेत. त्यामुळे सत्तेत कायदेशीर वाटा राहील आणि महाआघाडीतील सर्व पक्ष निवडणुकीत उभे राहिले, असाही संदेश जाईल, असा तीनही पक्षांचा यामागचा हेतू आहे. ७८पैकी राष्ट्रवादी केवळ पाच आणि काँग्रेस अवघ्या १३ जागांवर स्वपक्षाचे उमेदवार उभे करू शकल्यामुळे दोघांच्या ताकदीचा अंदाज गुप्त राहिलेला नाही. खासगीत बोलताना दोन्ही पक्षांचे नेते याची कबुली देतात.

राष्ट्रवादीची अवस्था बिकट

राष्ट्रवादीच्या वाट्याला १२ जागा असे वरकरणी दिसत असले तरी राष्ट्रवादीचे प्रत्यक्षात फक्त पाचजण निवडणूक रिंगणात आहेत. हे पाचही जण पदाधिकारी आणि त्यांचे नातेवाईक आहेत. तालुकाध्यक्षांची मुलगी शिवानी घरत, माजी नगरसेवक अजय भोईर, कळंबोली शहर अध्यक्ष विजय खानावकर, विधानसभा अध्यक्ष सतिष पाटील, खारघर शहराध्यक्षांची पत्नी संध्या शालब्रिंदे हेच प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे पाच उमेदवार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज