जालना : परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घालत बेसुमार बरसल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विमा कंपन्यांनी विम्यातून कापूस पिकाला वगळल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीकविम्यात कापसाचा समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी महसूल मंडळात खरीपाचा कापूस पिकाची लागवड झाल्यापासून सुरुवातीचे दोन महिने कोरडे गेले. त्यानंतरच्या दोन महिन्यांत सलग पाऊस झाला. परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले. अंतरवाली टेंभी मंडळातील बराचसा भाग काळी व चिकनमातीचा असल्याने जमिनीमध्ये पाणी धरण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्याने या मंडळातील कापसाच्या पिके पुर्णतः नष्ट झालेले आहेत. केवळ सोयाबीन व बाजरी वगळता इतर पिकांना विम्यातून वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बि-बियाणे, खत, कीटकनाशके आणून कापसाची जोपासना केली होती.
‘पीकविम्यात कापसाचा समावेश करावा’
परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घालत बेसुमार बरसल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2019, 4:00 am