म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
नवी मुंबईत उभ्या राहत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची सर्वाधिक मागणी होत असताना काहींनी वेगवेगळी नावे सुचवून नावावरून राजकारण सुरू केले होते. मात्र रविवारी प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या पाचव्या स्मृती दिनाचे निमित्त साधत एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या वतीने नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर दि. बा. पाटील यांच्या नावाचा फलक प्रकल्पग्रस्तांनी लावला.
नवी मुंबईची उभारणी करताना भूमिपुत्रांच्या जमिनी सिडकोने सक्तीने संपादित केल्या. त्यावेळी भूमिपुत्रांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी लढा उभारला आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले. आज भूमिपुत्रांना मिळणारा मोबदला दि. बा. पाटील यांच्याच त्यागामुळे मिळाला आहे. मात्र आतापर्यंत नवी मुंबईत उभ्या राहिलेल्या कोणत्याच मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता उभ्या राहत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव मिळावे, अशी भूमिपुत्रांची इच्छा आहे. मात्र मागे एका कार्यक्रमात मंत्री अनंत गीते यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले जाण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर संभाजी महाराज, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बॅ. ए. आर. अंतुले यांच्या नावाची मागणीही काहींनी केली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या नावावरून राजकारण तापू लागले होते. मात्र नवी मुंबईतील या जमिनीवर विमानतळ उभे राहत आहे त्या जमिनीसाठी दि. बा. पाटील यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यामुळे या विमानतळाला 'दिबां'चेच नाव मिळाले पाहिजे ही मागणी असल्याने कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांच्या पुढाकाराने शिवक्रांती मावळा संघटना, स्थानिक मच्छिमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विमानतळाच्या जागेवर दि. बा. पाटील यांच्या नावाचा फलक लावला आणि विमानतळाचे नामकरण करून घेतले.
विमानतळाचे नामकरण करण्यासाठी यावेळी समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, शिवक्रांती संघटनेचे किरण केणी, मच्छिमार संघटनेचे राहुल कोली, चेतन डाऊर, वसंत म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगसेवक सतिश पाटील, दापोली ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान घोपरकर आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
नवी मुंबईत उभ्या राहत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची सर्वाधिक मागणी होत असताना काहींनी वेगवेगळी नावे सुचवून नावावरून राजकारण सुरू केले होते. मात्र रविवारी प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या पाचव्या स्मृती दिनाचे निमित्त साधत एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या वतीने नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर दि. बा. पाटील यांच्या नावाचा फलक प्रकल्पग्रस्तांनी लावला.
नवी मुंबईची उभारणी करताना भूमिपुत्रांच्या जमिनी सिडकोने सक्तीने संपादित केल्या. त्यावेळी भूमिपुत्रांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी लढा उभारला आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले. आज भूमिपुत्रांना मिळणारा मोबदला दि. बा. पाटील यांच्याच त्यागामुळे मिळाला आहे. मात्र आतापर्यंत नवी मुंबईत उभ्या राहिलेल्या कोणत्याच मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता उभ्या राहत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव मिळावे, अशी भूमिपुत्रांची इच्छा आहे. मात्र मागे एका कार्यक्रमात मंत्री अनंत गीते यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले जाण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर संभाजी महाराज, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बॅ. ए. आर. अंतुले यांच्या नावाची मागणीही काहींनी केली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या नावावरून राजकारण तापू लागले होते. मात्र नवी मुंबईतील या जमिनीवर विमानतळ उभे राहत आहे त्या जमिनीसाठी दि. बा. पाटील यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यामुळे या विमानतळाला 'दिबां'चेच नाव मिळाले पाहिजे ही मागणी असल्याने कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांच्या पुढाकाराने शिवक्रांती मावळा संघटना, स्थानिक मच्छिमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विमानतळाच्या जागेवर दि. बा. पाटील यांच्या नावाचा फलक लावला आणि विमानतळाचे नामकरण करून घेतले.
विमानतळाचे नामकरण करण्यासाठी यावेळी समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, शिवक्रांती संघटनेचे किरण केणी, मच्छिमार संघटनेचे राहुल कोली, चेतन डाऊर, वसंत म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगसेवक सतिश पाटील, दापोली ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान घोपरकर आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.