पाणीप्रश्नावरून महापौरांचा आयुक्तांवर आरोप
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
पाणीप्रश्नाच्या लक्षवेधीवर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारणसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील १५ मिमीपेक्षा मोठ्या पाणी जोडणी असलेल्या हॉटेल व इतर व्यावसायिक आस्थापना विनामीटर मोफत पाणी वापरत असल्याचे व्यक्तव्य केले. हे वक्तव्य बेजबाबदार असल्याचा आरोप महापौर सुधाकार सोनावणे यांनी केला. नवी मुंबईतील जनता ही प्रामाणिकपणे पाण्याचे पैसे मीटरनुसार भरत असताना आयुक्त नागरिकांचा अपमान करून जाणीवपूर्वक या शहराला बदनाम करत असल्याचे महापौर म्हणाले.
पाणीप्रश्नाच्या लक्षवेधीवर सभागृहात दिवसभर गंभीर चर्चा होऊनदेखील प्रशासनाच्या आठमुठ्या धोरणामुळे ठोस निर्णय होऊ शकला नाही. अखेर महापौरांनी आपल्या अधिकारात नवी मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महापालिका प्राशासनाला दिले. आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर तीन महिन्यांपासून नवी मुंबईकरांना पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी सभागृहाने घेतलेल्या निर्णयाला बगल देत आयुक्त महापालिकेच्या मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा असतानादेखील प्रति माणसी १३५ लीटरच पाणीपुरवठा करण्यावर ठाम राहिले आहेत. आयुक्तांच्या या कठोर भूमिकेमुळे नवी मुंबईत पाणीबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे मंगळवारी पार पडलेल्या तहकूब सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सूरज पाटील यांनी नवी मुंबईतील पाणी समस्येवर लक्षवेधी मांडून या प्रश्नाला वाचा फोडली.
पाण्याच्या लक्षवेधीवर बोलताना काँग्रेसच्या नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी गेल्या वर्षभरात पाण्याची गळती, पाण्याची चोरी आणि नियोजनाबाबत महापालिकेने काय पावले उचलली, याचा खुलासा करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी पाण्याच्या लक्षवेधीवर अभ्यासपूर्ण मत व्यक्त केले. पर्यावरण अहवालात पाणी गळतीचे जे १९ टक्के प्रमाण दिले आहे, ते चुकीचे असून हे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रश्नांना सिटी इंजिनीअर मोहन डगांवकर यांनी दिलेल्या तांत्रिक उत्तरामुळे सदस्यांचे समाधान न झाल्याने महापौरांसह सर्व सदस्य आक्रमक झाले. आयुक्तांनी ठोस उत्तर द्यावे, असे आदेश महापौरांनी दिले. त्यावर नोव्हेंबर २०१५मध्ये घेण्यात आलेल्या पाणीपुरवठा संदर्भातील निर्णयानुसार आजही शहराला ३३० एमएलडी पाणीपुरवठा केला जात असल्याचे ते म्हणाले.
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
पाणीप्रश्नाच्या लक्षवेधीवर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारणसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील १५ मिमीपेक्षा मोठ्या पाणी जोडणी असलेल्या हॉटेल व इतर व्यावसायिक आस्थापना विनामीटर मोफत पाणी वापरत असल्याचे व्यक्तव्य केले. हे वक्तव्य बेजबाबदार असल्याचा आरोप महापौर सुधाकार सोनावणे यांनी केला. नवी मुंबईतील जनता ही प्रामाणिकपणे पाण्याचे पैसे मीटरनुसार भरत असताना आयुक्त नागरिकांचा अपमान करून जाणीवपूर्वक या शहराला बदनाम करत असल्याचे महापौर म्हणाले.
पाणीप्रश्नाच्या लक्षवेधीवर सभागृहात दिवसभर गंभीर चर्चा होऊनदेखील प्रशासनाच्या आठमुठ्या धोरणामुळे ठोस निर्णय होऊ शकला नाही. अखेर महापौरांनी आपल्या अधिकारात नवी मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महापालिका प्राशासनाला दिले. आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर तीन महिन्यांपासून नवी मुंबईकरांना पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी सभागृहाने घेतलेल्या निर्णयाला बगल देत आयुक्त महापालिकेच्या मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा असतानादेखील प्रति माणसी १३५ लीटरच पाणीपुरवठा करण्यावर ठाम राहिले आहेत. आयुक्तांच्या या कठोर भूमिकेमुळे नवी मुंबईत पाणीबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे मंगळवारी पार पडलेल्या तहकूब सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सूरज पाटील यांनी नवी मुंबईतील पाणी समस्येवर लक्षवेधी मांडून या प्रश्नाला वाचा फोडली.
पाण्याच्या लक्षवेधीवर बोलताना काँग्रेसच्या नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी गेल्या वर्षभरात पाण्याची गळती, पाण्याची चोरी आणि नियोजनाबाबत महापालिकेने काय पावले उचलली, याचा खुलासा करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी पाण्याच्या लक्षवेधीवर अभ्यासपूर्ण मत व्यक्त केले. पर्यावरण अहवालात पाणी गळतीचे जे १९ टक्के प्रमाण दिले आहे, ते चुकीचे असून हे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रश्नांना सिटी इंजिनीअर मोहन डगांवकर यांनी दिलेल्या तांत्रिक उत्तरामुळे सदस्यांचे समाधान न झाल्याने महापौरांसह सर्व सदस्य आक्रमक झाले. आयुक्तांनी ठोस उत्तर द्यावे, असे आदेश महापौरांनी दिले. त्यावर नोव्हेंबर २०१५मध्ये घेण्यात आलेल्या पाणीपुरवठा संदर्भातील निर्णयानुसार आजही शहराला ३३० एमएलडी पाणीपुरवठा केला जात असल्याचे ते म्हणाले.