म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर येथील खाडी किनाऱ्यांवरील सीआरझेडमधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय पर्यावरणंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर याबाबत आठवडाभरात निर्णय घेतले जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी यावेळी दिले.
ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर यांच्या महापालिका हद्दीतील खाडीकिनारीच्या सीआरझेडबाधित धोकादायक इमारतींचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. येथे ५० ते ६० वर्षांपासून कोळी बांधव राहत असून त्यांची घरे सीआरझेडमध्ये गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्बांधणीला आणि नव्या बांधकामांना परवानगी मिळत नाही. या इमारती अतिशय जुन्या झाल्या असून पावसाळा सुरू होणार असल्यामुळे त्यांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. येथील सर्व इमारती धोकादायक बनल्या आहेत. त्यांच्या पुनर्विकासाला सीआरझेडमधून सवलत द्यावी, अशी विनंतीही केली आहे.
नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर येथील खाडी किनाऱ्यांवरील सीआरझेडमधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय पर्यावरणंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर याबाबत आठवडाभरात निर्णय घेतले जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी यावेळी दिले.
ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर यांच्या महापालिका हद्दीतील खाडीकिनारीच्या सीआरझेडबाधित धोकादायक इमारतींचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. येथे ५० ते ६० वर्षांपासून कोळी बांधव राहत असून त्यांची घरे सीआरझेडमध्ये गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्बांधणीला आणि नव्या बांधकामांना परवानगी मिळत नाही. या इमारती अतिशय जुन्या झाल्या असून पावसाळा सुरू होणार असल्यामुळे त्यांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. येथील सर्व इमारती धोकादायक बनल्या आहेत. त्यांच्या पुनर्विकासाला सीआरझेडमधून सवलत द्यावी, अशी विनंतीही केली आहे.