\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\Bकरोना लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या ३९४ मजुरांना त्यांच्या गावी स्वतंत्र बसेसने पाठविण्यात आले. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
लॉकडाऊनमुळे पायी आलेल्या या मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांतातर्फे तपासणी करून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्या परवानगी घेवून भोजन पाकिटासह विविध बसेस मधून यवतमाळ, पुसद ,नांदेड, उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड येथे जाण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी विहिंप देवगिरी प्रांत विशेष संपर्क प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी पुढाकार घेतला. उदगीर येथून सुरक्षित वावर ठेवून ट्रॅव्हल्सद्वारे २१ मजुरांना छत्तीसगड येथे पाठवण्यात आले. प्रांत संघटनमंत्री संतोष कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. रेल्वेस्टेशनवर जमलेल्या मजुरांना भोजन पाकिटांचे वितरण करण्यात आले. प्रांत अध्यक्ष संजय बारगजे, राजीव जहागिरदार, काशिनाथ दापके, प्रभाकर अणदूरकर, प्रकाश गायकवाड, शैलेश पत्की व सुभाष कुमावत उपस्थित होते.