ठाणे : १०, २०, ३० वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतचा सरकारीनिर्णय जाहीर होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र या योजनेनुसार वेतनाची अंमलबाजवणी न केल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे कर्मचारी नाराज आहेत. जिल्हा परिषदेतील सुमारे एक हजाराहून अधिक कर्मचारी या योजनेच्या प्रतीक्षेत असल्याचे कर्मचारी तसेच संघटनांचे पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने मार्च २०१९मध्ये सुधारित सेवेअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतंर्गत जिल्हा परिषद शिक्षकेतर कर्मचारी तसेच अन्य कर्मचारी यांना ठराविक मुदतीनंतर अतिरिक्त वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, शासननिर्णय काढून नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप या योजनेतंर्गत एकाही कर्मचाऱ्याला पदोन्नती वेतनश्रेणीचा लाभ मिळाला नसल्याची खंत कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यामध्ये ४० वाहनचालक, सुमारे ३०० शिपाई तसेच ५०० ते ६०० लिपिक वर्ग तसेच बांधकाम विभागातील कर्मचारी यांचा समावेश आहे.
जि. परिषद कर्मचारी लाभाच्या प्रतीक्षेत
१०, २०, ३० वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतचा सरकारीनिर्णय जाहीर होऊन नऊ महिन्यांचा कालावधी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2019, 4:00 am