मुंबई ः राज्यात लॉकडाउनचा निर्णय लागू करताना सर्व प्रकारची दारूची दुकाने त्वरित बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे दारूवर खर्च होणारा पैसा कुटुंबाच्या भरणपोषणासाठी उपयोगी आल्यामुळे भुकेचा उद्रेकही काही प्रमाणांत कमी झाल्याचे निदर्शनास आल्याचे व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने स्पष्ट केले आहे. मंचातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मद्यदुकाने लॉकडाउनच्या काळात उघडू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.मद्यविक्री बंद असल्याने अनेक व्यसनाधीन व्यक्ती कायमचे निर्व्यसनी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दारूबंदी उठवणे दुष्परिणामकारक ठरेल, असे मत या मंचातर्फे व्यक्त करण्यात आले आहे. महसूलाचा विचार करताना चैनीच्या उत्पादनावर १ ते २ टक्के कर वाढवावा, आमदार निधी रद्द करावा, असे उपाय सुचवण्यात आले आहेत. थुंकी ही करोना प्रसाराला पूरक असल्याने गुटखा, तंबाखू विकणारी दुकाने बंद करावी आणि गुटखा वाहतुकीवर लक्ष ठेवावे, अशीही मागणी मंचातर्फे करण्यात आली आहे.
मद्यदुकाने उघडण्याची परवनागी नकोच
मुंबई ः राज्यात लॉकडाउनचा निर्णय लागू करताना सर्व प्रकारची दारूची दुकाने त्वरित बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Apr 2020, 4:00 am