मुंबईः मुंबईसह राज्यातील गोरगरीब झोपडीधारकांच्या पुनर्वसनाच्या न्यायहक्कासाठी आमचा संघर्ष असून, २०१४पर्यंतच्या सर्व झोपड्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी केली. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली झोपडीधारकांच्या मागण्यांसाठी वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 'आमची फिरत नाही खोपडी म्हणून तुटते आमची झोपडी, जर फिरली आमची खोपडी तर तुटू देणार नाही आमची झोपडी' अशी शीघ्र कविता त्यांनी सादर केली.
आठवलेंचा मोर्चा
मुंबईः मुंबईसह राज्यातील गोरगरीब झोपडीधारकांच्या पुनर्वसनाच्या न्यायहक्कासाठी आमचा संघर्ष असून, २०१४पर्यंतच्या सर्व झोपड्यांना कायदेशीर संरक्षण ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2020, 4:00 am