ठाणे जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
ग्रामीण भागातील महिला बचत गट म्हटले की, पापड, लोणची आणि मसाला तयार करणे ही त्यांची ओळख सहसा असते, मात्र महिला बचत गटांना शेती व्यवसायाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषेदने महिला ग्रामसंघासाठी ‘कृषी अवजारे बँक’ ही अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पिकांच्या लावणीपासून धान्य भरडण्यापर्यंतची सर्व यंत्रसामुग्री महिला बचत गटांना उपलब्ध करून दिल्याने बचतगट ग्रामसंघ शेती व्यवसायात स्वयंपूर्ण होणार आहेत.
महिला बचत गटांना शेती व्यवसायाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषेदने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘कृषी अवजारे बँक’ ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिला बचत गटांना पिकाच्या लावणीपासून ते पीक तयार झाल्यावर धान्य भरडण्यापर्यंतची सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. ठाणे जिल्ह्याचे प्रमुख पीक म्हणजे भात. जिल्ह्यात खरीप हंगामात ९० टक्के भाताची लागवड केली जाते. त्यामुळे भातपिकाला लागणारी सर्व प्रकारची अवजारे या महिला बचत गटांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अंबरनाथ तालुक्यातील दहिवली-भोज गावात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी या शेती अवजारांची माहिती शेतकऱ्यांना देत ती कशी वापरावीत, याचे प्रात्यक्षिक करून दाखवल्याची माहिती पंचायत समिती अंबरनाथचे कृषी अधिकारी आर. एच. पाटील यांनी दिली. या योजनेत दहिवली गावातील १० महिला बचत गटांचा ग्रामसंघ स्थापन करून त्यांना ९० टक्के अनुदानावर ही यंत्रसामुग्री देण्यात आली.
या अवजारांमध्ये मशागतीसाठी मिनी ट्रॅक्टर, रोपांची लागवड करण्यासाठी भात लावणी मशिन , कीड रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बॅटरीवर चालणारे फवारणी पंप, तसेच तयार झालेला भात कापण्यासाठी भात कापणी मशिन, स्वयंचालित भात मळणी यंत्र, बॅटरीवर चालणारे फवारणी यंत्र आणि गवत कापणी मशिन, तसेच तयार झालेला भात झोडणीसाठी स्वयंचलित मळणी यंत्र आणि शेवटचा टप्पा म्हणजे घरात आलेला भात भरडण्यासाठी मिनी राइस मिल ही सर्व यंत्र या महिला ग्रामसंघांना देण्यात आले आहेत. ही सर्व यंत्रे स्वयंचलित असल्याने मजुराच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊन शेतीची कामे जलद होणार आहेत. यामुळे शेतीच्या कामाला वेग येऊन महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच या ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक गणित सुटण्यास मदत होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे.
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
ग्रामीण भागातील महिला बचत गट म्हटले की, पापड, लोणची आणि मसाला तयार करणे ही त्यांची ओळख सहसा असते, मात्र महिला बचत गटांना शेती व्यवसायाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषेदने महिला ग्रामसंघासाठी ‘कृषी अवजारे बँक’ ही अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पिकांच्या लावणीपासून धान्य भरडण्यापर्यंतची सर्व यंत्रसामुग्री महिला बचत गटांना उपलब्ध करून दिल्याने बचतगट ग्रामसंघ शेती व्यवसायात स्वयंपूर्ण होणार आहेत.
महिला बचत गटांना शेती व्यवसायाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषेदने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘कृषी अवजारे बँक’ ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिला बचत गटांना पिकाच्या लावणीपासून ते पीक तयार झाल्यावर धान्य भरडण्यापर्यंतची सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. ठाणे जिल्ह्याचे प्रमुख पीक म्हणजे भात. जिल्ह्यात खरीप हंगामात ९० टक्के भाताची लागवड केली जाते. त्यामुळे भातपिकाला लागणारी सर्व प्रकारची अवजारे या महिला बचत गटांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अंबरनाथ तालुक्यातील दहिवली-भोज गावात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी या शेती अवजारांची माहिती शेतकऱ्यांना देत ती कशी वापरावीत, याचे प्रात्यक्षिक करून दाखवल्याची माहिती पंचायत समिती अंबरनाथचे कृषी अधिकारी आर. एच. पाटील यांनी दिली. या योजनेत दहिवली गावातील १० महिला बचत गटांचा ग्रामसंघ स्थापन करून त्यांना ९० टक्के अनुदानावर ही यंत्रसामुग्री देण्यात आली.
या अवजारांमध्ये मशागतीसाठी मिनी ट्रॅक्टर, रोपांची लागवड करण्यासाठी भात लावणी मशिन , कीड रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बॅटरीवर चालणारे फवारणी पंप, तसेच तयार झालेला भात कापण्यासाठी भात कापणी मशिन, स्वयंचालित भात मळणी यंत्र, बॅटरीवर चालणारे फवारणी यंत्र आणि गवत कापणी मशिन, तसेच तयार झालेला भात झोडणीसाठी स्वयंचलित मळणी यंत्र आणि शेवटचा टप्पा म्हणजे घरात आलेला भात भरडण्यासाठी मिनी राइस मिल ही सर्व यंत्र या महिला ग्रामसंघांना देण्यात आले आहेत. ही सर्व यंत्रे स्वयंचलित असल्याने मजुराच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊन शेतीची कामे जलद होणार आहेत. यामुळे शेतीच्या कामाला वेग येऊन महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच या ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक गणित सुटण्यास मदत होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे.