अ‍ॅपशहर

फराळाचे पदार्थ महागले

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी जोरदार खरेदी सुरू आहे. त्यात फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठीही लगबग सुरू आहे. मात्र यंदा हे फराळाचे साहित्य महागल्यामुळे गृहिणींचा थोडा हिरमोड झाला आहे. करंजीसाठी लागणारे रवा, मैदा, डालडा, खोबऱ्याचे दर या वर्षी २० ते ३० टक्यांनी वाढले आहेत.

Maharashtra Times 1 Nov 2018, 1:33 am
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम faral


अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी जोरदार खरेदी सुरू आहे. त्यात फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठीही लगबग सुरू आहे. मात्र यंदा हे फराळाचे साहित्य महागल्यामुळे गृहिणींचा थोडा हिरमोड झाला आहे. करंजीसाठी लागणारे रवा, मैदा, डालडा, खोबऱ्याचे दर या वर्षी २० ते ३० टक्यांनी वाढले आहेत.

घाऊक बाजारात या वर्षी रवा ३२ रुपये किलो, मैदा ३२ रु किलो, डालडा ९० ते १०० रुपये किलो झाला आहे. पोहे ४४ ते ४८ रुपये किलो झाले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोबरे २३० ते २४० रुपये किलो झाले आहेत. सर्वात जास्त दर खोबऱ्याचे वाढले आहेत. खोबऱ्याचा कीस तर २५० ते २७० रुपये किलो झाला आहे. गेल्या वर्षी रवा २८ ते ३० रुपये किलो होता. मैदाही २८ ते ३० रुपये किलो, डालडा ७० ते ८० रुपये किलो आणि खोबरे २०० रुपये किलो झाले होते. यंदाच्या दिवाळीत खोबरे २४० रुपये किलोवर गेले आहे. साखरेचे दर मात्र गेल्या वर्षीच्या मानाने या वर्षी कमी झाले आहेत. गेल्या दिवाळीत साखर ४० ते ४२ रु किलो होती या वर्षी मात्र साखर ३५ते ३७ रु. किलो आहे. त्यामुळे साखरेने सर्वांचे तोंड गोड केले आहे तर लाडू करण्यासाठी लागणाऱ्या बेसनचे दर या वर्षी कमी झाले आहेत. गेल्या वर्षी बेसन ९० ते १०० रुपये किलो झाले होते, या वर्षी मात्र हे दर ८० ते ८५ रुपये किलो झाले आहेत, अशी माहिती व्यापारी हर्षद देढीया यांनी दिली. यांचे दर कमी झाले असले तरी खोबऱ्याच्या वाढत्या दराने सर्वांचे गणित बिघडले आहे. नेहमी ७० ते ८० रुपये किलो असणारे खोबऱ्याचे दर गेल्या दोन वर्षांपासून वाढत आहेत. या वर्षी हे दर २५० वर गेल्याने अनेक जण कमी प्रमाणात खोबरे खरेदी करत आहेत.

सुका मेवाही महागला

दिवाळीच्या फराळात थोडा तरी सुका मेवा टाकला जातोच. तसेच, भेट देण्यासाठीही सुक्यामेव्याला पसंती दिली जाते. त्यामुळे सुक्या मेव्याची मागणी वाढल्याने त्याचे दरही वाढले आहेत. मागील महिन्यात बदाम ७५० ते ९०० रुपये किलो, काजू ८०० ते १२०० रुपये किलो, मनुका ३०० ते ६०० रुपये किलो, अंजीर १२०० ते १४०० रुपये किलो, पिस्ता एक हजार ते १४०० रुपये किलो, अक्रोड १००० ते १२०० रुपये किलो झाले होते आणि आता तर प्रत्येकाच्या दरात किलोमागे तीस ते चाळीस रुपयांची वाढ झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज