मुंबईः भाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरते. म्हणूनच त्या उत्तर प्रदेशातील सोनभद्र याठिकाणी हिंसाचारपीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या असता, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका यांना अटक केली. या बेकायदा अटकेच्या निषेधार्थ थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादर पश्चिम येथे इंडियाबुल्ससमोर तीव्र निदर्शने केली व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले.
‘प्रियंकांना सरकार घाबरते’
मुंबईः भाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरते...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2019, 4:00 am