मुंबईः परतीच्या पावसाने राज्यभरात कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतक-यांना मदत द्यावी. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक आदी नेते उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मदत करा
मुंबईः परतीच्या पावसाने राज्यभरात कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Oct 2019, 4:00 am