अ‍ॅपशहर

सफाई कामगारांचा सन्मान

महिला दिनाचे औचित्य साधत वाशीतील नगरसेविका विद्या गायकवाड यांच्या वतीने परिसरातील सफाई कामगार महिलांना सन्मानित करण्यात आले.

Maharashtra Times 12 Mar 2017, 3:00 am
नवी मुंबई : महिला दिनाचे औचित्य साधत वाशीतील नगरसेविका विद्या गायकवाड यांच्या वतीने परिसरातील सफाई कामगार महिलांना सन्मानित करण्यात आले. या १२ सफाई कामगार महिला दररोज कचरा उचलत असल्यामुळे आपला परिसर स्वच्छ होतो. त्यामुळे या महिलांचे आभार मानण्यात आले. वाशी सेक्टर ६मधील रोटरी क्लबच्या सभागृहात सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांना भेटवस्तूही देण्यात आल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम honor to women sanitation worker
सफाई कामगारांचा सन्मान


महिलांचा गौरव

नवी मुंबई : नवी मुंबई रिटेल केमिस्ट अॅण्ड होलसेलर्स असोसिएशनतर्फे सानपाडा परिसरातील विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव करण्यात आला. सानपाडा येथील सेक्टर ८मध्ये असलेल्या केमिस्ट भवनात बुधवारी स्त्रीशक्ती सन्मान सोहळा पार पडला. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा संदेश या वेळी देण्यात आला. कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेल्या महिलांना आदराने वागवून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. दृष्टिकोन बदलला तरच तिच्यावरील अत्याचार बंद होतील, असे मत पोलिस उपायुक्त नितीन पवार यांनी मांडले.

उत्पन्न मर्यादेत वाढ

नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी लाभार्थींच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाच्या मर्यादेत सहा लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पुनरज्जीवित करण्यासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे आभार मानले.

‘महिलांनी प्रगत व्हावे’

नवी मुंबई : शहरातील महिलांची प्रगती झपाट्याने होत असली, तरी आजही ग्रामीण भागातील पाच टक्केच महिला प्रगतिशील आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिला प्रगत होणे, हाच महिलांचा खरा गौरव आहे. महिलांच्या प्रगतीसाठी सर्वांनीच प्रयत्न करणे, हाच खरा महिलादिन ठरेल, असे मत फेस्कॉमच्या कोकण विभागाच्या अध्यक्ष आसावरी फडणीस यांनी व्यक्त केले. नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघटनातर्फे महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

रूंदीकरणाला विरोध

नवी मुंबई : रस्ता रूंदीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना साडे बावीस टक्के भूखंड देण्याचे ठरवण्यात आले होते. आता मात्र या भूखंडाऐवजी रोख मोबदला देण्याचा घाट घातला जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्ता रूंदीकरणाला विरोध करण्याचा पवित्रा घेतला आहे. जेएनपीटी बंदराचा पसारा वाढत असल्याने जेएनपीटीत येणाऱ्या वाहनांसाठी रस्ते अपुरे पडू लागले आहेत. म्हणून जेएनपीटीने बंदराला जोडणाऱ्या एनएच-४बी व राज्य महामार्ग क्र. ५४ या दोन रस्त्यांच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. याला विरोध करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.

भाजपचा जल्लोष

कल्याण : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांप्रमाणेच कल्याणच्या शिवाजी चौकात भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत फटाके फोडत ढोल-ताशांच्या गजराने परिसर दणाणून सोडला. नागरिकांना मिठाई वाटली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज