मुंबई: अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती प्रदेशातून भारताकडे येणारी व्यापारी जहाजे व तेलवाहू नौकांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन संकल्प' हे मोहीम हाती घेतली आहे. जगातील ७० टक्के व्यापार अरबी समुद्रातून होतो. त्यामध्ये बहुतांश तेलवाहू जहाजांचा समावेश असतो. भारतासह चीन, श्रीलंका, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया या देशांचा तेलपुरवठा याच समुद्रातून होतो. त्यामुळे अरबी समुद्रातील व्यापारी जहाजांच्या सुरक्षेची जबाबदारी नौदलावर आहे. इराणच्या दक्षिणेला असलेल्या होमरुझच्या आखातात व्यापारी व तेलवाहू जहाजांवर हल्ल्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळेच नौदलाने तेथे युद्धनौका व गस्ती हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. याखेरीज आणखी एक युद्धनौका मुंबईच्या पश्चिम कमांड मुख्यालयातून धाडण्यात आली आहे, असे नौदल जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.
भारतीय नौदलाचे ‘ऑपरेशन संकल्प’
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती प्रदेशातून भारताकडे येणारी व्यापारी जहाजे व तेलवाहू नौकांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन संकल्प' ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2020, 4:00 am