मुंबईः कार्यालयीन कामाच्या वाढत्या व्यापामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या मुंबईतील महिलांना लवकरच रेल्वेच्या जवानांचा आधार मिळणार आहे. रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना घरापर्यंत अथवा इतर सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी 'कॉल करा, आरपीएफ बोलवा' ही योजना राबवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने घेतला आहे. या योजनेंतर्गत रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १८२वर दूरध्वनी करून महिलांना रात्री १२ ते पहाटे सकाळी ६ दरम्यान सुरक्षित प्रवासासाठी जवानांची मागणी करण्यात येईल.
महिलांच्या सोबत जवान
मुंबईः कार्यालयीन कामाच्या वाढत्या व्यापामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या मुंबईतील महिलांना लवकरच रेल्वेच्या जवानांचा आधार मिळणार आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2020, 4:00 am