नवी मुंबई: गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेला खारघरमधील रिक्षा चालकांचा संप आज अखेर मागे घेण्यात आला. रिक्षा चालकांच्या युनियनने संप मागे घेण्याची घोषणा करताच खारघरमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
खारघर रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी भरण्यावरून खारघरची एकता रिक्षा युनियन आणि तळोजा विभागीय प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना यांच्यात हद्दीच्या वादातून बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यवसन हाणामारी आणि रिक्षा तोडफोडीत झाले होते. दोन्ही संघटनेच्या पाच पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले होते. स्थानिक असल्यामुळे प्रवासी भरण्याच्या अधिकार आपल्याला असल्याचे दोन्ही संघटनांचे म्हणणे होते. पोलीस स्थानकापर्यंत पोचलेल्या वादात कुणीच माघार घेत नसल्यामुळे गेले २० दिवस खारघर मध्ये रिक्षा बंद ठेवण्याची भूमिका दोन्ही संघटनांनी घेतली होती. या सगळ्यात खारघरवासीय प्रवाशांचे मात्र हाल होत होते.
आज शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांनी पुढाकार घेत दोन्ही संघटनांसोबत चर्चा केली. तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चेनंतर यशस्वी तोडगा काढण्यात आला. या तोडग्यानुसार त्यानुसार खारघर मध्ये तळोजातील संघटनेसाठी चार थांबे देण्यास एकता संघटना राजी झाली. रेल्वे स्थाकावर यापैकी एक थांबा असणार आहे. हा सुवर्णमध्य सगळ्यांना मान्य असल्याने गेले २० दिवस सुरु असलेला संपाचा तिढा सुटला आहे.
खारघर मधील खारघर एकता रिक्षा चालक संघटना ही आपल्या जुन्या जागी असलेल्या स्टँडवर आपल्या रिक्षा उभ्या करून व्यवसाय करणार आहे. तर, तळोजा रिक्षा संघटना खारघर रेल्वे स्थानकाजवळील सबवे शेजारी, तसेच डी मार्ट, प्रणम हॉटेल, वास्तुविहार, गोल्डन स्वीट बँक ऑफ इंडिया, या ठिकाणी आपले रिक्षा स्टँड उभारून व्यवसाय करतील असा ठराव या चर्चेदरम्यान करण्यात आला आहे.
खारघर रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी भरण्यावरून खारघरची एकता रिक्षा युनियन आणि तळोजा विभागीय प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना यांच्यात हद्दीच्या वादातून बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यवसन हाणामारी आणि रिक्षा तोडफोडीत झाले होते. दोन्ही संघटनेच्या पाच पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले होते. स्थानिक असल्यामुळे प्रवासी भरण्याच्या अधिकार आपल्याला असल्याचे दोन्ही संघटनांचे म्हणणे होते. पोलीस स्थानकापर्यंत पोचलेल्या वादात कुणीच माघार घेत नसल्यामुळे गेले २० दिवस खारघर मध्ये रिक्षा बंद ठेवण्याची भूमिका दोन्ही संघटनांनी घेतली होती. या सगळ्यात खारघरवासीय प्रवाशांचे मात्र हाल होत होते.
आज शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांनी पुढाकार घेत दोन्ही संघटनांसोबत चर्चा केली. तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चेनंतर यशस्वी तोडगा काढण्यात आला. या तोडग्यानुसार त्यानुसार खारघर मध्ये तळोजातील संघटनेसाठी चार थांबे देण्यास एकता संघटना राजी झाली. रेल्वे स्थाकावर यापैकी एक थांबा असणार आहे. हा सुवर्णमध्य सगळ्यांना मान्य असल्याने गेले २० दिवस सुरु असलेला संपाचा तिढा सुटला आहे.
खारघर मधील खारघर एकता रिक्षा चालक संघटना ही आपल्या जुन्या जागी असलेल्या स्टँडवर आपल्या रिक्षा उभ्या करून व्यवसाय करणार आहे. तर, तळोजा रिक्षा संघटना खारघर रेल्वे स्थानकाजवळील सबवे शेजारी, तसेच डी मार्ट, प्रणम हॉटेल, वास्तुविहार, गोल्डन स्वीट बँक ऑफ इंडिया, या ठिकाणी आपले रिक्षा स्टँड उभारून व्यवसाय करतील असा ठराव या चर्चेदरम्यान करण्यात आला आहे.