सर्व समाजाला खूश करण्याचा महाआघाडीचा प्रयत्न
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना या महाआघाडीचा जाहीरनामा शनिवारी खारघर येथे प्रसिद्ध करण्यात आला. शहरात दर्जेदार सोयीसुविधांसोबत महाआघाडीने महापालिका क्षेत्रात सर्व समाजातील महापुरुषांच्या नावाने तब्बल वेगवेगळी १२ भवने बांधण्याचे आश्वासन दिले आहे. महापालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत सर्व समाजाला खूश करण्याचा प्रयत्न शेकाप आणि मित्र पक्षांनी केला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, कामगार नेते महेंद्र घरत आदी उपस्थित होते. ‘असे असेल आपले पनवेल’ या मथळ्याखाली मुबलक पाणीपुरवठा, महिला सबलीकरण दर्जेदार पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, दर्जेदार शिक्षण, भुयारी गटार यंत्रणा, उत्तम आरोग्य, संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जाईल, आदी आश्वासने देण्यात आली आहेत. जाहीरनाम्याच्या पुस्तिकेतील १२ क्रमांकाच्या पानावर वेगवेगळी ११ भवने उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यामध्ये वारकरी भवन, आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आगरी कोळी कराडी भवन, आण्णासाहेब पाटील माथाडी कामगार भवन, संत शिरोमणी रोहिदास महाराज भवन, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विचार भवन, राजर्षी शाहू महाराज सामाजिक भवन, वाल्मिकी समाज भवन, अहिल्याबाई होळकर भवन, पत्रकारांसाठी पत्रकार भवन, महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक भवन अशी सर्व समाजातील महापुरुषांच्या नावे भवने उभारण्याचे आश्वासन दिले आहे. निवडणुकीत सर्व समाज घटकाला आपलेसे करण्यासाठी महाआघाडीने हे आश्वासन बनविले आहे. याशिवाय, खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराज कलादालन, नागपूरच्या ड्रॅगन पॅलेसच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय महाबोधी विहार, सोनबा येवले पाणपोई, ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह आणि महापालिकेची दिमाखदार वास्तू अशी आश्वासनांची खैरात केली आहे. पनवेलमध्ये काय बदल घडायला हवा, या विषयीची मते नागरिकांकडून मागविण्यात आली होती, त्यानुसार नागरिकांच्या मतांचा आणि सूचनांचा अंतर्भाव या जाहीरनाम्यात केला असल्याचे महाआघाडीचे निमंत्रक माजी आमदार विवेक पाटील यांनी मनोगतात म्हटले आहे.
पनवेल महानगराला समृद्ध करण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना या महाआघाडीचा जाहीरनामा शनिवारी खारघर येथे प्रसिद्ध करण्यात आला. शहरात दर्जेदार सोयीसुविधांसोबत महाआघाडीने महापालिका क्षेत्रात सर्व समाजातील महापुरुषांच्या नावाने तब्बल वेगवेगळी १२ भवने बांधण्याचे आश्वासन दिले आहे. महापालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत सर्व समाजाला खूश करण्याचा प्रयत्न शेकाप आणि मित्र पक्षांनी केला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, कामगार नेते महेंद्र घरत आदी उपस्थित होते. ‘असे असेल आपले पनवेल’ या मथळ्याखाली मुबलक पाणीपुरवठा, महिला सबलीकरण दर्जेदार पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, दर्जेदार शिक्षण, भुयारी गटार यंत्रणा, उत्तम आरोग्य, संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जाईल, आदी आश्वासने देण्यात आली आहेत. जाहीरनाम्याच्या पुस्तिकेतील १२ क्रमांकाच्या पानावर वेगवेगळी ११ भवने उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यामध्ये वारकरी भवन, आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आगरी कोळी कराडी भवन, आण्णासाहेब पाटील माथाडी कामगार भवन, संत शिरोमणी रोहिदास महाराज भवन, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विचार भवन, राजर्षी शाहू महाराज सामाजिक भवन, वाल्मिकी समाज भवन, अहिल्याबाई होळकर भवन, पत्रकारांसाठी पत्रकार भवन, महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक भवन अशी सर्व समाजातील महापुरुषांच्या नावे भवने उभारण्याचे आश्वासन दिले आहे. निवडणुकीत सर्व समाज घटकाला आपलेसे करण्यासाठी महाआघाडीने हे आश्वासन बनविले आहे. याशिवाय, खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराज कलादालन, नागपूरच्या ड्रॅगन पॅलेसच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय महाबोधी विहार, सोनबा येवले पाणपोई, ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह आणि महापालिकेची दिमाखदार वास्तू अशी आश्वासनांची खैरात केली आहे. पनवेलमध्ये काय बदल घडायला हवा, या विषयीची मते नागरिकांकडून मागविण्यात आली होती, त्यानुसार नागरिकांच्या मतांचा आणि सूचनांचा अंतर्भाव या जाहीरनाम्यात केला असल्याचे महाआघाडीचे निमंत्रक माजी आमदार विवेक पाटील यांनी मनोगतात म्हटले आहे.
पनवेल महानगराला समृद्ध करण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.