अ‍ॅपशहर

धावती बस पेटली, सतर्क चालकामुळं ४८ प्रवासी बचावले

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर येथे धावत्या बसनं अचानक पेट घेतला. सतर्क बसचालकामुळं बसमधील ४८ प्रवाशांचा जीव वाचला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेत कुणीही जखमी झालं नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2020, 5:01 pm
नवी मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर येथे धावत्या बसनं अचानक पेट घेतला. सतर्क बसचालकामुळं बसमधील ४८ प्रवाशांचा जीव वाचला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेत कुणीही जखमी झालं नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bus-fire


बसचालकाच्या सतर्कतेमुळं बसमधून प्रवास करणाऱ्या ४८ जणांचा जीव वाचला. त्यामुळं बसचालकाचं कौतुक होत आहे. बसमधून प्रवास करणारे बहुतेक प्रवासी हे मुंबईतील रहिवासी आहेत. सुरुवातीला बसमधून धूर येऊ लागला. हे चालकानं पाहिलं. त्यानंतर लगेच धावत्या बसनं पेट घेतला. काही वेळानं बस जळून खाक झाली.

मुंबईतल्या आगी आता रोबोट विझवणार

पालघर: वऱ्हाडाच्या बसला अपघात; १८ जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस सिंधुदुर्गवरून मुंबईकडे येत होती. पोलादपूर येथे बस आली, त्यावेळी मागच्या चाकाच्या बाजूला धूर निघत असल्याचं चालकानं आरशात पाहिलं. 'धूर निघत असल्याचं मी आरशात पाहिलं. मी रस्त्याच्या बाजूला बस थांबवली आणि सगळ्या प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितलं,' अशी माहिती चालक विद्यानंद किर्लोस्कर यांनी दिली. बसमधून सामानही बाहेर काढण्यात आलं. बस रिकामी झाली, त्यानंतर काही क्षणांतच बसनं पेट घेतला. प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली आणि त्या बसनं त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं. या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज