मुंबई : 'मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील शहरांमधील अनिवासी भाग नागरिकांना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी ३१ डिसेंबरला रात्रभर खुला ठेवण्यात यावा. तसेच, मुंबईतील मॉल्स २४ तास उघडे असावेत, जेणेकरून रोजगारांची संधी उपलब्ध होईल,' अशी मागणी युवा सेनेचे प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 'मुंबईसह राज्यातील अन्य शहरातील दुकाने, मॉल्स हे २४ उघडी असावीत, याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी गृहखात्याकडे प्रलंबित आहे, तरीही या प्रस्तावास मान्यता द्यावी. यामुळे राज्याच्या उत्पन्नात वाढ होईल,' असे ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
‘३१ डिसेंबरला मॉल रात्रभर सुरू ठेवा’
'मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील शहरांमधील अनिवासी भाग नागरिकांना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी ३१ डिसेंबरला रात्रभर ...
30 28 Dec 2018, 4:00 am