पनवेल:
गुजरातमधील मोदींच्या प्रचार रॅलीची प्रचंड गर्दी दाखवण्यासाठी भाजपच्या आयटी सेलने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचे फोटो वापरल्याची पोलखोल करतानाच हुकूमशाही येणार की लोकशाही टिकणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे गेली पाच वर्ष थापा मारून देशाची वाट लावणारं मोदी-शहा नावाचं देशावरचं संकट आताच घालवा, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं.
सलग दोन दिवस मुंबईतील सभांमधून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर घणाघाती हल्ला केल्यानंतर राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मोदी-शहांवर निशाणा साधला. खांदेश्वर रेल्वेस्थानकाजवळील गणेश मैदानावर पार पडलेल्या सभेत राज यांनी पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातमधील गावात सुविधांचा बोजवारा उडविल्याचा व्हिडिओ दाखवतानाच मोदींच्या काळातचं अनेकजण कोट्यवधी रुपयांना चुना लावून देशाबाहेर पळाल्याचं सांगितलं. ही लोकसभा निवडणूक विलक्षण आहे. जो पक्ष निवडणूक लढवत नाहीये. त्या पक्षावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होत आहे. माझे उमेदवारच नसल्याने माझ्यावर टीका केल्याने मला काय फरक पडणार आहे? पण माझ्या टीकेमुळे सत्ताधाऱ्यांना नक्कीच फरक पडणार आहे, अशी टोलेबाजी करत राज यांनी भाषणाला सुरुवात केली.
लोकांनी विश्वास टाकून भाजपला बहुमत दिलं. त्याबदल्यात भाजपनं लोकांना स्वप्न दाखवून फसवले. प्रचंड बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांना खोटं बोलण्याची वेळच का येते? असा सवाल त्यांनी केला.
गर्दीसाठी वाजपेयींच्या अंत्ययात्रेचे फोटो वापरले
यावेळी राज यांनी गुजरातमधील मोदींच्या प्रचार रॅलीची एका व्हिडिओच्या माध्यामातून पोलखोल केली. मोदींनी गुजरातमध्ये निवडणुकीचा फॉर्म भरला तेव्हा त्यांच्या रॅलीत गर्दीची त्सुनामी आल्याचं भाजपनं भासवलं. त्यांच्या आयटी सेलकडून तसे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल करण्यात आले. मात्र एका वृत्तवाहिनीने जेव्हा सत्याचा शोध घेतला. तेव्हा भाजपच्या आयटी सेलने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचे फोटो आणि व्हिडिओ मोदींच्या रॅलीसाठी वापरून मोदींच्या रॅलीची ही गर्दी असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला, असं सांगतानाच भाजप त्यावर का बोलत नाही? असा सवालच राज यांनी केला.
अक्षय कुमारच्या मुलाखतीची खिल्ली उडवली
अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीचीही राज यांनी खिल्ली उडवली. ही आजवरची सर्वात अप्रतिम मुलाखत होती. अशी मुलाखत कधीच कोणी घेऊ शकणार नाही, असा टोला लगावतानाच त्याने प्रश्न काय विचारला? पंतप्रधानजी तुम्ही आंबा खाता का?... मग चोखून खाता की कापून खाता?... काय मजाक लावलाय? अशा शब्दात राज यांनी अक्षयकुमारवर टीका केली. अलिकडे आलेले सुई धागा, पॅडमॅन आणि उरी हे सर्व चित्रपट केंद्र सरकार पुरस्कृत आहेत. हिटलरही त्याचा विचार पेरण्यासाठी अशा फिल्म्स बनवायचा असं त्यांनी निदर्शनात आणून दिलं.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्ताची दखल
राज यांनी यावेळी 'टाइम्स ऑफ इंडिया'तील एक बातमी दाखवून सरकारची पोलखोल केली. बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये २५० माणसं मारल्याचं शहा सांगतात. मीडियातही हा आकडा फुगवून सांगण्याची चढाओढ लागलेली होती. आम्ही त्यावर प्रश्न विचारला तर आम्हाला देशद्रोही ठरवलं. मोदीही पुरावे मागणाऱ्यांना देशद्रोही म्हणत होते. मात्र 'टाइम्स ऑफ इंडिया'तील एका बातमीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी बालाकोटमध्ये एकही व्यक्ती मारला गेला नसल्याचं स्पष्ट केलं. मग त्या देशभक्त की देशद्रोही?, असा सवालही त्यांनी केला.
उद्या बुफेच आहे
मी रोज सभेमध्ये एक-दोन व्हिडिओ दाखवून भाजपची पोलखोल करतो. प्रत्येक सभेत एक नवा व्हिडिओ वाढवायचो. उद्या प्रचाराची शेवटची सभा आहे. त्यामुळे उद्या बुफेच आहे, असं सांगत राज यांनी व्हिडिओच्या माध्यमातून भाजपची नवी पोलखोल करणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे उद्या राज कोणता बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज गर्जले...
>> जेएनपीटीत भुखंड गेले. त्याबदल्यात इरादा पत्र देण्यात आलं. मोदींच्या हस्ते इरादा पत्र दिलं गेलं. त्याचं पुढं काय झालं? त्याचा फॉलोअप नाही अन् बसवलेल्या मुख्यमंत्र्यांकडून काहीच अपेक्षा नाही
>> नोटबंदीच्या अगोदर आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या सहीने २ हजाराच्या नोटा परदेशात छापल्या गेल्या. त्या नोटा भारतात आणून जुन्या नोटांच्या बदल्यात जवळपास ३ लाख कोटी रुपये बदलून दिले गेले. असा आरोप देशातील निष्णात वकील कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्यावर भाजपने आजवर प्रतिक्रिया का दिली नाही? एवढा गंभीर आरोप झाल्यानंतर सिब्बल यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही?
>> नोटाबंदी, जीएसटी, मेक इंडियाचं काय झालं? लोकांना रोजगार देणार होतात त्याचं काय झालं? मोदी या सर्व मुद्द्यांवर कधी बोलणार?
>> एका प्रकरणात सीबीआय नीरव मोदीची चौकशी करणार होती. त्यापूर्वीच तो देशातून फरार कसा झाला? मोदींच्या काळातच अनेक उद्योगपती बँकांना बुडवून देशाबाहेर फरार कसे झाले?
>> विजय मल्ल्या ९ हजार कोटींचं कर्ज फेडायला तयार होता. पण त्याला संधी का दिली नाही? आणि १ लाख २० हजार कोटींचं कर्ज असलेल्या अनिल अंबानींना राफेल विमान बनविण्याचं काम कसं दिलं? ज्याला साधी कार बनविण्याचा अनुभव नाही, त्याला एअर फोर्सचं विमान बनविण्याचं कंत्राट मिळतच कसं?
>> आरबीआयच्या राखीव निधीला हात घालायची सरकारवर वेळ येत असेल, तर मोदी पुलवामा हल्ल्यानंतर कशाच्या जीवावर युद्ध करायला निघाले होते?
>> मोदींनी काँग्रेसच्या काळातील योजनांची नावं बदलून त्याच योजना पुन्हा घोषित केल्या. या योजना यशस्वीपणे राबवण्याऐवजी त्यांच्या जाहिरातींवर ४.५ ते ५ हजार कोटी रुपये खर्च केले
>> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात १ लाख २० हजार विहिरी बांधल्या, मोदी म्हणतात, आम्ही एका आठवड्यात ८ लाख संडास बांधले, वनमंत्री म्हणाले १५ कोटी झाडं लावली... दावेच असे करायचे जे तपासताच येणार नाही. पण आम्ही याचा शोध घेणार
>> गेली साडेचार वर्ष सेना-भाजप एकमेकांवर टीका करत होते. 'युती नही होती तो हम पटक देंगे' असं शहा म्हणाले होते. एवढा मान-अपमान होऊनही मग युती झालीच कशी? हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी आणि पैश्यासाठी लाचार आहेत.
>> 'अच्छे दिन'ची घोषणा सुद्धा यांची नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्या वडिलांची ही घोषणा आहे.
गुजरातमधील मोदींच्या प्रचार रॅलीची प्रचंड गर्दी दाखवण्यासाठी भाजपच्या आयटी सेलने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचे फोटो वापरल्याची पोलखोल करतानाच हुकूमशाही येणार की लोकशाही टिकणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे गेली पाच वर्ष थापा मारून देशाची वाट लावणारं मोदी-शहा नावाचं देशावरचं संकट आताच घालवा, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं.
सलग दोन दिवस मुंबईतील सभांमधून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर घणाघाती हल्ला केल्यानंतर राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मोदी-शहांवर निशाणा साधला. खांदेश्वर रेल्वेस्थानकाजवळील गणेश मैदानावर पार पडलेल्या सभेत राज यांनी पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातमधील गावात सुविधांचा बोजवारा उडविल्याचा व्हिडिओ दाखवतानाच मोदींच्या काळातचं अनेकजण कोट्यवधी रुपयांना चुना लावून देशाबाहेर पळाल्याचं सांगितलं. ही लोकसभा निवडणूक विलक्षण आहे. जो पक्ष निवडणूक लढवत नाहीये. त्या पक्षावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होत आहे. माझे उमेदवारच नसल्याने माझ्यावर टीका केल्याने मला काय फरक पडणार आहे? पण माझ्या टीकेमुळे सत्ताधाऱ्यांना नक्कीच फरक पडणार आहे, अशी टोलेबाजी करत राज यांनी भाषणाला सुरुवात केली.
लोकांनी विश्वास टाकून भाजपला बहुमत दिलं. त्याबदल्यात भाजपनं लोकांना स्वप्न दाखवून फसवले. प्रचंड बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांना खोटं बोलण्याची वेळच का येते? असा सवाल त्यांनी केला.
गर्दीसाठी वाजपेयींच्या अंत्ययात्रेचे फोटो वापरले
यावेळी राज यांनी गुजरातमधील मोदींच्या प्रचार रॅलीची एका व्हिडिओच्या माध्यामातून पोलखोल केली. मोदींनी गुजरातमध्ये निवडणुकीचा फॉर्म भरला तेव्हा त्यांच्या रॅलीत गर्दीची त्सुनामी आल्याचं भाजपनं भासवलं. त्यांच्या आयटी सेलकडून तसे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल करण्यात आले. मात्र एका वृत्तवाहिनीने जेव्हा सत्याचा शोध घेतला. तेव्हा भाजपच्या आयटी सेलने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचे फोटो आणि व्हिडिओ मोदींच्या रॅलीसाठी वापरून मोदींच्या रॅलीची ही गर्दी असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला, असं सांगतानाच भाजप त्यावर का बोलत नाही? असा सवालच राज यांनी केला.
अक्षय कुमारच्या मुलाखतीची खिल्ली उडवली
अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीचीही राज यांनी खिल्ली उडवली. ही आजवरची सर्वात अप्रतिम मुलाखत होती. अशी मुलाखत कधीच कोणी घेऊ शकणार नाही, असा टोला लगावतानाच त्याने प्रश्न काय विचारला? पंतप्रधानजी तुम्ही आंबा खाता का?... मग चोखून खाता की कापून खाता?... काय मजाक लावलाय? अशा शब्दात राज यांनी अक्षयकुमारवर टीका केली. अलिकडे आलेले सुई धागा, पॅडमॅन आणि उरी हे सर्व चित्रपट केंद्र सरकार पुरस्कृत आहेत. हिटलरही त्याचा विचार पेरण्यासाठी अशा फिल्म्स बनवायचा असं त्यांनी निदर्शनात आणून दिलं.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्ताची दखल
राज यांनी यावेळी 'टाइम्स ऑफ इंडिया'तील एक बातमी दाखवून सरकारची पोलखोल केली. बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये २५० माणसं मारल्याचं शहा सांगतात. मीडियातही हा आकडा फुगवून सांगण्याची चढाओढ लागलेली होती. आम्ही त्यावर प्रश्न विचारला तर आम्हाला देशद्रोही ठरवलं. मोदीही पुरावे मागणाऱ्यांना देशद्रोही म्हणत होते. मात्र 'टाइम्स ऑफ इंडिया'तील एका बातमीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी बालाकोटमध्ये एकही व्यक्ती मारला गेला नसल्याचं स्पष्ट केलं. मग त्या देशभक्त की देशद्रोही?, असा सवालही त्यांनी केला.
उद्या बुफेच आहे
मी रोज सभेमध्ये एक-दोन व्हिडिओ दाखवून भाजपची पोलखोल करतो. प्रत्येक सभेत एक नवा व्हिडिओ वाढवायचो. उद्या प्रचाराची शेवटची सभा आहे. त्यामुळे उद्या बुफेच आहे, असं सांगत राज यांनी व्हिडिओच्या माध्यमातून भाजपची नवी पोलखोल करणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे उद्या राज कोणता बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज गर्जले...
>> जेएनपीटीत भुखंड गेले. त्याबदल्यात इरादा पत्र देण्यात आलं. मोदींच्या हस्ते इरादा पत्र दिलं गेलं. त्याचं पुढं काय झालं? त्याचा फॉलोअप नाही अन् बसवलेल्या मुख्यमंत्र्यांकडून काहीच अपेक्षा नाही
>> नोटबंदीच्या अगोदर आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या सहीने २ हजाराच्या नोटा परदेशात छापल्या गेल्या. त्या नोटा भारतात आणून जुन्या नोटांच्या बदल्यात जवळपास ३ लाख कोटी रुपये बदलून दिले गेले. असा आरोप देशातील निष्णात वकील कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्यावर भाजपने आजवर प्रतिक्रिया का दिली नाही? एवढा गंभीर आरोप झाल्यानंतर सिब्बल यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही?
>> नोटाबंदी, जीएसटी, मेक इंडियाचं काय झालं? लोकांना रोजगार देणार होतात त्याचं काय झालं? मोदी या सर्व मुद्द्यांवर कधी बोलणार?
>> एका प्रकरणात सीबीआय नीरव मोदीची चौकशी करणार होती. त्यापूर्वीच तो देशातून फरार कसा झाला? मोदींच्या काळातच अनेक उद्योगपती बँकांना बुडवून देशाबाहेर फरार कसे झाले?
>> विजय मल्ल्या ९ हजार कोटींचं कर्ज फेडायला तयार होता. पण त्याला संधी का दिली नाही? आणि १ लाख २० हजार कोटींचं कर्ज असलेल्या अनिल अंबानींना राफेल विमान बनविण्याचं काम कसं दिलं? ज्याला साधी कार बनविण्याचा अनुभव नाही, त्याला एअर फोर्सचं विमान बनविण्याचं कंत्राट मिळतच कसं?
>> आरबीआयच्या राखीव निधीला हात घालायची सरकारवर वेळ येत असेल, तर मोदी पुलवामा हल्ल्यानंतर कशाच्या जीवावर युद्ध करायला निघाले होते?
>> मोदींनी काँग्रेसच्या काळातील योजनांची नावं बदलून त्याच योजना पुन्हा घोषित केल्या. या योजना यशस्वीपणे राबवण्याऐवजी त्यांच्या जाहिरातींवर ४.५ ते ५ हजार कोटी रुपये खर्च केले
>> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात १ लाख २० हजार विहिरी बांधल्या, मोदी म्हणतात, आम्ही एका आठवड्यात ८ लाख संडास बांधले, वनमंत्री म्हणाले १५ कोटी झाडं लावली... दावेच असे करायचे जे तपासताच येणार नाही. पण आम्ही याचा शोध घेणार
>> गेली साडेचार वर्ष सेना-भाजप एकमेकांवर टीका करत होते. 'युती नही होती तो हम पटक देंगे' असं शहा म्हणाले होते. एवढा मान-अपमान होऊनही मग युती झालीच कशी? हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी आणि पैश्यासाठी लाचार आहेत.
>> 'अच्छे दिन'ची घोषणा सुद्धा यांची नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्या वडिलांची ही घोषणा आहे.