अ‍ॅपशहर

मनसैनिकांची जामिनावर सुटका

कामोठ्यातील मानसरोवर रेल्वे स्थानकात व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी हल्ला करून त्यांच्या सामानाची नासधूस केली होती. कामोठे पोलिसांनी सकाळी १० वाजता मनसेच्या पाच प्रमुख कार्यकर्त्यांना मंगळवारी सकाळी अटक केली होती. पनवेल न्यायालयाने सायंकाळी त्यांची जामिनावर सुटका केली.

Maharashtra Times 29 Nov 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mns workers who beat hawkers get bail
मनसैनिकांची जामिनावर सुटका


कामोठ्यातील मानसरोवर रेल्वे स्थानकात व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी हल्ला करून त्यांच्या सामानाची नासधूस केली होती. कामोठे पोलिसांनी सकाळी १० वाजता मनसेच्या पाच प्रमुख कार्यकर्त्यांना मंगळवारी सकाळी अटक केली होती. पनवेल न्यायालयाने सायंकाळी त्यांची जामिनावर सुटका केली.

रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर अंतरावर व्यवसाय, फेरीवाल्यांना मज्जाव आहे मात्र मानसरोवर रेल्वे स्थानकात ५० मीटर अंतरावर बसून परप्रांतीय फेरीवाले व्यवसाय करतात. म्हणून कामोठ्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी या फेरीवाल्यांना लक्ष्य केले. त्यांच्या सामानाची नासधूस करून मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी धाव घेतली असता मनसैनिकांनी पळ काढला.

मंगळवारी सकाळी १० वाजता विक्रेत्यांवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांना अटक करण्यात आली. यामध्ये मनसेचे सुधीर नवले, मिलिंद खाडे, रोहित दुडवरक, अविनाश पडवळ, सतिश बकवाड आदींचा समावेश होता. सायंकाळी सहा वाजता पनवेल न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका झाली. मनसेचे वकील अक्षय काशिद यांनी मनसैनिकांची बाजू मांडली. उच्च न्यायालयाचे आदेश असताना रेल्वे स्थानकाच्या बाहेर ५० मीटरच्या आत फेरीवाल्यांना बसविले जाते, मात्र त्यांच्यावर रेल्वे प्रशासन आणि पोलिस कारवाई करीत नसल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर केल्याचे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज