नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्जतमधील मोरबे धरणात पाणीसाठा पूर्ण झाल्याने अतिरिक्त पाण्याचा पालिकेच्या वतीने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याचा हा विसर्ग पाहण्यासाठी आणि पाण्याचा आंनद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत आहेत. ज्या ठिकाणी विसर्ग होत आहे, तिथे सुरक्षारक्षक जाळी नसल्यामुळे पर्यटक पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सुरक्षारक्षकाला पर्यटक न जुमानता त्याच्याशी हुज्जत घलात असतात. त्यामुळे त्या ठिकाणी संरक्षित जाळी बसवावी आणि पोलिस कर्मचारी उपलब्ध करावेत, अशी मागणी नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
'मोरबे धरणावर सुरक्षा हवी'
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्जतमधील मोरबे धरणात पाणीसाठा पूर्ण झाल्याने अतिरिक्त पाण्याचा पालिकेच्या वतीने विसर्ग सुरू करण्यात आला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2019, 4:00 am