रायगड:
काल दिवसभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे कर्नाळाजवळ पूल खचल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आधीच पावसाची रिपरिप आणि त्यात गेल्या तीन तासांपासून झालेली वाहतूक कोंडी यामुळे मुंबईवरून गोव्याकडे आणि गोव्यावरून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ऐन सकाळी सकाळीच वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबईसह राज्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आज सकाळी ८ च्या सुमारास कर्नाळाजवळ पूल खचला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तीन तास झाले तरी वाहतुकीची कोंडी फुटली नसल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. संततधार कोसळणारा पाऊस आणि वाहतुकीची कोंडी यामुळे प्रवाशांना गाड्यांमध्येच तिष्ठत बसावे लागले आहे. वाहतूक कोंडीमुळे परतीचा प्रवास करणेही शक्य नसल्याने प्रवाशांची कोंडी झाली असून प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येत आहे. मात्र, वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने पर्यायी मार्गावरही वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे दिसत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काल दिवसभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे कर्नाळाजवळ पूल खचल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आधीच पावसाची रिपरिप आणि त्यात गेल्या तीन तासांपासून झालेली वाहतूक कोंडी यामुळे मुंबईवरून गोव्याकडे आणि गोव्यावरून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ऐन सकाळी सकाळीच वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबईसह राज्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आज सकाळी ८ च्या सुमारास कर्नाळाजवळ पूल खचला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तीन तास झाले तरी वाहतुकीची कोंडी फुटली नसल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. संततधार कोसळणारा पाऊस आणि वाहतुकीची कोंडी यामुळे प्रवाशांना गाड्यांमध्येच तिष्ठत बसावे लागले आहे. वाहतूक कोंडीमुळे परतीचा प्रवास करणेही शक्य नसल्याने प्रवाशांची कोंडी झाली असून प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येत आहे. मात्र, वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने पर्यायी मार्गावरही वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे दिसत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.