मुंबईः 'मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला होता. तसेच विरोधी पक्षांना एकत्रित करून ईव्हीएम विरोधात जनआंदोलन छेडले आहे. मोदी, शहा यांच्या हुकूमशाही विरोधात ठाम उभे राहिल्यामुळेच राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारची ही दडपशाही आहे', अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. 'मोदी, शहा हे हुकूमशाही पद्धतीने देश चालवत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाच्या मागे ईडी, प्राप्तिकर विभाग, सीबीआयची चौकशी लावली जात आहेत. वरिष्ठ काँग्रसे नेते पी. चिदंबरम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनाही अशाच प्रकारे त्रास देण्यात येत आहे', असे थोरात म्हणाले. 'देशभरातील विरोधी पक्षाचे जे नेते सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवतात, त्यांना अशा प्रकारच्या नोटीस देऊन त्रास दिला जात आहे. मोदी आणि शहा हे घटनात्मक संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लोकशाहीसाठी घातक आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना ईडीच्या नोटिसा पाठवायच्या, देशद्रोही ठरवायचे हाच मोदी, शहा यांचा न्यू इंडिया आहे', असे थोरात म्हणाले.
मुंबईः 'मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने
मुंबईः 'मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2019, 4:00 am