मुंबईः ईव्हीएमला विरोध केल्याच्या रागातूनच राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेने दिला आहे. २२ ऑगस्ट रोजी राज यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असून, त्या दिवशी ठाण्यात बंद पाळण्यात येईल, असेही मनसेने जाहीर केले. राज यांच्या नोटिशीवरून मनसेचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सरकारने सूडाच्या भावनेतून राज यांच्यापाठी ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला असल्याचे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. ईव्हीएम विरोधात राज ठाकरे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळत असून, ते डोळ्यात खुपत असल्यानेच सरकार त्याचा राग या नोटिशीच्या माध्यमातून काढत असल्याचा आरोप मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला.
मुंबईः ईव्हीएमला विरोध केल्याच्या रागातूनच राज
मुंबईः ईव्हीएमला विरोध केल्याच्या रागातूनच राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवली आहे त्यामुळे याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेने दिला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2019, 4:00 am