अ‍ॅपशहर

प्लास्टिकबंदीवरून मुंबईकर संभ्रमातच

म टा...

Maharashtra Times 20 Jul 2018, 4:00 am

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीला एक महिना पूर्ण होत आला तरी पुरेशी जनजागृती केली जात नसल्याने मुंबईकरांमध्ये अद्याप संभ्रम आहे. तर दुसरीकडे महापालिका प्रशासन नगरसेवकांना प्लास्टिकबंदीबाबत विचारात घेत नाही, हा नगरसेवकांचा अवमान आहे, असा आरोप करत गुरुवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका सभागृहात प्रशासनावर टीकेचा आसूड ओढला.

प्लास्टिकबंदीनंतर पालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दंड न भरणाऱ्या १३७ जणांना पालिकेने न्यायालयात खेचले असून, २८ दिवसांत ४० लाख ८० हजारांचा दंड वसूल केला आहे. मात्र प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीला महिना होत आला तरी पुरेशी जनजागृती मात्र झालेली नाही. कोणते प्लास्टिक वापरावे, कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे व कोणत्या प्लास्टिकला सूट देण्यात आली आहे, य़ाबाबत नागरिकांना माहिती नाही. कारवाईची माहिती प्रशासन ट्वीटरवर जाहीर करते. रिटेल व्यावसायिकांना प्लास्टिकबंदीतून सूट देण्यात आली आहे, मग फूल व्यावसायिकांना का नाही? पालिकेकडून हा दुजाभाव का? प्लास्टिकबंदी फक्त सर्वसामान्यांसाठी आहे, का असा सवाल गुरुवारी पालिका सभागृहात नगरसेवकांनी विचारला.

प्लास्टिकबंदी अंमलबजावणीसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण प्रशासनाने नगरसेवकांना दिले नाही. नगरसेवकांना नागरिकांनी निवडून दिले आहे. त्यांनाच प्लास्टिकबंदीबाबत माहिती नसल्य़ाने नागरिकांना उत्तर काय द्यायचे असा सवालही प्रशासनाला विचारला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज