नवी मुंबई: जी व्यक्ती बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची होऊ शकली नाही तो माणूस नवी मुंबईकरांचा काय होणार, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. उड्डाणपुलासाठी होऊ घातलेल्या झाडांच्या कत्तलीवरून नवी मुंबईतील राजकारण सध्या पेटले आहे. या मुद्द्यावरुन रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले. (BJP and NCP agitation aginst tree cutting in Navi Mumbai वृक्षतोडीचा हा ठराव नवी मुंबईला स्वत:ची सल्तनत मानणाऱ्या गणेश नाईक यांच्या पुढाकारानेच २००८ साली मंजूर झाला होता. या पापाची जाणीव गणेश नाईक यांचं मन आतल्याआत खात होती. त्यामुळेच आज आमच्या आंदोलनाच्या दिवशी गणेश नाईक यांनी आंदोलन केले. याठिकाणी वृक्षांची कत्तल करुन ४५० कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्याचा ठराव नाईक यांनीच मंजूर करवून घेतला होता. गणेश नाईक ही स्वार्थी व्यक्ती आहे. हा माणूस कधीच कोणाचा होऊ शकला नाही. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना घडवलं त्यांची साथ गणेश नाईक यांनी सोडली. ज्या शरद पवार यांनी सत्तेतला सगळा वाटा आणि संपूर्ण जिल्हा हवाली केला त्यांच्याशीही गणेश नाईक यांनी ईमान राखले नाही. असा माणूस नवी मुंबईकरांचा काय होणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.
या उड्डाणपुलासाठी कोणाला तरी १० टक्के रक्कम मिळाली, अशी चर्चा आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक बांगर यांनीही २००८ मधील या ठरावाची अंमलबजावणी आता २०२२ मध्ये करायचे का ठरवले? राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या व्यक्तीने IAS होऊ नये, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.
नवी मुंबईत गणेश नाईकांचं आंदोलन
नवी मुंबईत झाडांची कत्तल रोखण्यासाठी गणेश नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपकडून (BJP) मोर्चा काढण्यात आला. नवी मुंबईतील वाशी अरेंजा सर्कल ते कोपरी असा २ किलोमीटरचा उड्डाणपूल होणार आहे. उड्डाणपुलासाठी ४०० झाडे कापली जाणार आहेत. तसेच एमआयडीसी महापे विभागीय कार्यालयाकडून रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करीत असताना रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जवळपास अडीच हजाराच्या वर झाडांचा बळी यात जाणार आहे. या सगळ्याविरोधात नवी मुंबईतील राजकीय पक्ष आता मैदानात उतरताना दिसत आहेत.
या उड्डाणपुलासाठी कोणाला तरी १० टक्के रक्कम मिळाली, अशी चर्चा आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक बांगर यांनीही २००८ मधील या ठरावाची अंमलबजावणी आता २०२२ मध्ये करायचे का ठरवले? राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या व्यक्तीने IAS होऊ नये, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.
नवी मुंबईत गणेश नाईकांचं आंदोलन
नवी मुंबईत झाडांची कत्तल रोखण्यासाठी गणेश नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपकडून (BJP) मोर्चा काढण्यात आला. नवी मुंबईतील वाशी अरेंजा सर्कल ते कोपरी असा २ किलोमीटरचा उड्डाणपूल होणार आहे. उड्डाणपुलासाठी ४०० झाडे कापली जाणार आहेत. तसेच एमआयडीसी महापे विभागीय कार्यालयाकडून रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करीत असताना रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जवळपास अडीच हजाराच्या वर झाडांचा बळी यात जाणार आहे. या सगळ्याविरोधात नवी मुंबईतील राजकीय पक्ष आता मैदानात उतरताना दिसत आहेत.