अ‍ॅपशहर

राष्ट्रवादीचे ‘गाजर फेको’

म टा प्रतिनिधी, मुंबईवाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी भाजपचे केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले असून, शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट होत आहेत...

Maharashtra Times 17 Oct 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी भाजपचे केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले असून, शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट होत आहेत. राज्यात बहुतांश भागात दुष्काळ जाहीर केला जात नाही. वाढते लोडशेडिंग आणि बेकारीचा प्रश्नावर उपाययोजना होत नाहीत असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईतील नरीमन पॉइंटच्या परिसरातील भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून गाजर फेकण्याचे आंदोलन केले.

'वाह रे मोदी तेरा खेल, घरपोच दारू महंगा तेल', 'मोदी सरकार हाय हाय', 'सरकार हमसे डरती है, पोलिसको आगे करती है', 'महागाई वाढ रोखलीच पाहिजे, लोडशेडिंग रद्द करा' अशा घोषणा देत मुंबई राष्ट्रवादीच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी आणलेले गाजर भाजप प्रदेश कार्यालयाकडे भिरकावले. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, राष्ट्रवादी मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.

राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह अन्य पदाधिकारी दुसरीकडे भाजप कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची काही काळ तारांबळ उडाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज